HW News Marathi
राजकारण

केवळ सत्तेसाठी नव्हे तर ही विचाराने केलेली युती आहे !

अमरावती | लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर पहिल्यांदाच भाजप-शिवसेना यांच्या युतीचा महामेळावा अमरावती येथे आज (१५ मार्च) सुरू आहे. युतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा एकाच मंचावर आले आहे. “केवळ सत्तेसाठी झालेली युती नसून ही विचाराने केलेली युती आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी या महामेळाव्यात म्हटले आहे.

कोणताच टीमचा कॅप्टन आमच्या समोर लढायला तयार नाही, नंतर एक माघार घेतो, दुसरा म्हणतो मी उभा राहणार नाही, पत्नी निवडणूक लढवणार असा टोला फडणवीस यांनी शरद पवार यांना नाव न घेता लगावला आहे. सत्ता येईल, जाईल.पण देश महत्वाचा आहे गेल्यावेळी ४२ जागा जिंकल्या.तो आपला रेकॉर्ड नव्हता. खरा रेकॉर्ड तर २०१९ मध्ये करायचा आहे. पूर्ण ताकदीने महाराष्ट्राला भगवे केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 5 वर्षात केंद्रात आणि राज्यात युतीच्या सरकारने केलेलं काम अभूतपूर्व आहे. सामान्य गरिबांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या. प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला, उजाला, प्रधानमंत्री जनारोग्य, शेतकरी सम्मान निधी, गरिबांसाठी अनेक योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून कल्याणकारी उपक्रम राबविले जात आहेत. निवडणुकीतील विजयापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान अधिक आनंद देतो

 

युतीच्या महामेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • ही युती भविष्यात देखील अशी राहणारी आहे
  • युतीमुळे विरोधकांच्या तोंडाचे पाणी पळविले आहे.
  • पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात अभूतपूर्व काम
  • युती होऊ नये म्हणून काही लोकांनी देव पाण्यात ठेवली आहे.
  • सत्तेसाठी झालेली नसून युती एका विचारांनी झाली आहे
  • आपला धर्म आणि उमेदवार म्हणजे युती
  • देशातील सर्वाधिक रोजगार एकट्या महाराष्ट्रात निर्माण झाले
  • जनधनसारखी योजना
  • गेल्यावेळी ४२ जागा जिंकल्या
  • २७% रोजगार निर्मिती केवळ ११ महिन्यात झाली.
  • १२ कोटी कुटुंब अशी आहेत ज्याकडे गॅस नव्हात परंतु आमच्या सरकारने उज्ज्वला योजनेद्वारे त्यांना गॅस दिला
  • प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला, उजाला, प्रधानमंत्री जनारोग्य, शेतकरी सम्मान निधी, गरिबांसाठी अनेक योजना राबविल्या
  • कल तक जो नामुमकिन था अब वो मुमकिन है
  • सामान्य गरिबांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या
  • निवडणुकीतील विजयापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान अधिक आनंद देतो

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

माढ्यातील ओपनिंग बॅट्समन आता संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहे !

News Desk

एसटी कर्मचा-यांचे तडकाफडकी निलंबन

News Desk