HW News Marathi
राजकारण

दानवे-खोतकरांच्या वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

जालना | आगामी निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी राजकीय पक्षांची जागांसाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. जालन्यातील लोकसभेच्या जागेबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज (४ मार्च) राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आहे. सध्या रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु आहेत. दरम्यान या चर्चेनंतर आमच्यात सर्व काही अलबेल असल्याचा दावा रावसाहेब दानवेंकडून केला जात आहे. मात्र, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच माझ्याबाबतीत अंतिम निर्णय घेतील”, असे खोतकर म्हणाले. यानंतर खुद्द मुख्यमंत्री यात मध्यस्थी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मंगळवारी (५ मार्च) मुंबईत अर्जुन खोतकर यांची भेट घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्यसह रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा करतील”, अशी माहिती सुभाष देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, “मी अद्याप मैदानात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच माझ्याबाबतीत अंतिम निर्णय घेतील. तसेच उद्धव ठाकरेंचा शब्द हा माझ्यासाठी अंतिम असेल”, असे अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार !

News Desk

जस्टिस लोया प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय असमाधानकारक | संजय निरुपम 

News Desk

अमेठीत राहुल गांधी राम तर मोदी रावणाच्या रुपातील पोस्टर वॉर

swarit