HW News Marathi
राजकारण

दक्षिण मुंबईत काँग्रेसाचा विराट मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्षांचाही सहभाग

मुंबई । भारतीय जनता पार्टी सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा केल्याच्या आरोपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईत काँग्रेसतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्षांचाही अध्यक्ष अशोक चव्हाण आणि अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

राफेल घोटाळा प्रकरणावरुन पुन्हा एकदा देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांच्या विधानामुळे फ्रान्ससह भारतातही खळबळ माजली आहे. भाजपा सरकारने राफेल विमान खरेदीमध्ये केलेला घोटाळा हा संरक्षण मंत्रालयाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आहेत. या घोटाळ्याविरोधात हा मोर्चा आहे, असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी सांगितलं.

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी वारंवार खोटे वक्तव्य करून देशातील १३० कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Aprna

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अजित पवार सभागृहात आक्रमक; म्हणाले…  

Aprna

कर्जमाफीसाठीही शेतकऱ्याला ‘अटी व शर्ती’ आणि ‘ऑनलाइन’ नावाखाली रडवले गेले !

News Desk