HW News Marathi
राजकारण

राफेल विमान कराराची कागदपत्रे गहाळ झाली, याचा अर्थ ती खरी होती !

नवी दिल्ली | राफेल लढाऊ विमान कराराची कागदपत्रे गहाळ झाली, तर यांचा अर्थ ती खरी होती, हे कबूल करा, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (७ मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. ही कागदपत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मंत्रलायतून गहाळ झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात मोदींची चौकशी हावी, अशी मागणी देखील राहुल यांनी केली आहे. राफेल प्रकरणी या पुनर्विचार याचिकेवर बुधवारी (६ मार्च) सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालायत सांगितले आहे. राफेल कराराची कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी आज पत्रकार परिषद करत मोदींवर हल्लाबोल्ल केला आहे.

पीएमओचा हस्तक्षेप होता, असे राफेल कराराच्या फाईलमध्ये नमूद केले होते. जर भाजप दोषी नाही, तर त्यांनी जेपीसीची मागणी का फेटाळली ?, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केली आहे. जसे देशातील युवांच्या नोकऱ्या गायब झाल्या, आर्थिक विकास अदृश्य झाला आणि आता राफेल कराराची कागदपत्रे देखील गायब झाली असल्याचे सांगत राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडली. ही कागतपत्रे गहाळ कशी झाली यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी राहुल यांनी केली आहे.

अनिल अंबानींच्या फायद्यासाठी पीएमओचा राफेल करारात समांतर सहभाग झाले होते. राफेल विमान कराराची कागदपत्रे गहाळ झाली असली तरी यांची संपूर्ण चौकशी पत्रकारांनी करावी, यात ज्या व्यक्तीने ३०,००० कोटीचा राफेल घोटाळ्यात सहभागी होता. तिच्यावरअद्याप कोणत्याच प्रकारची चौकशी करण्यात आली नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माधवन नायर यांचा भाजपमध्ये प्रवेश

Gauri Tilekar

अहमदनगर-नाशिकवर अन्याय होऊ देणार नाही !

Gauri Tilekar

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाकडे लाखोंची बेहिशोबी मालमत्ता – नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल

swarit