HW News Marathi
राजकारण

काँग्रेस विजयाच्या अती आनंदामुळे कार्यकर्त्याचा मृत्यू

मुंबई | काँग्रेसने तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजयी पदाका फडकविली आहे. या विजयामुळे देशभारात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या जल्लोषात जळगावच्या पारोळा येथील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे (७२) यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरन अनुष्ठान यांनी मंगळवारी(११ डिसेंबर) ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकरे यांना फोन करून विजयोत्सव साजरा करण्यासाठी पारोळा येथे या असा निरोप दिला. काँग्रेसला तीन राज्यात यश मिळाल्याचे मोबाईल फोनवरून ऐकताच आंनदाच्या भरात ठाकरे यांना हृदयविकाराचा झटका आला. ठाकरे हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच त्यांना तत्काळ पारोळा येथील रुग्णालयात दाखल केले. ठाकरे यांना पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवले. ठाकरे यांच्यावर धुळ्यात उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ठाकरे हे सुरुवातीपासून काँग्रेसचे कार्यकर्ते होते. तालुका सरचिटणीस आणि तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, नातू आणि मुलगी असा परिवार आहे. ठाकरे यांच्यावर बुधवारी(१३ डिसेंबर) सायकांळी अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने पारोळा परिसरात शोककळा पसरली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीर खऱ्या अर्थाने भारतात विलीन झाले !

News Desk

नितेश यांची आक्रमकता कायम ठेऊन आम्ही त्यांना संयमाचे धडे देऊ !

News Desk

Sharad Pawar ED Case | पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

News Desk
राजकारण

छिंदमच्या विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल

News Desk

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून संपूर्ण राज्याचा रोष ओढवून घेणाऱ्या श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ९ मधून २००० पेक्षा जास्त मतांसह विजयी झाला. परंतु, याबाबत आता आक्षेप घेण्यात आला आहे. छिंदमच्या विजयालाच आव्हान देणारी याचिका निलेश म्हसे यांनी याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. निलेश म्हसे हे या निवडणुकीत छिंदमच्या विरोधात उभे राहिले होते. छिंदमची झालेली निवड रद्द ठरवावी, अशी मागणी देखील या याचिकेमार्फत करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेमुळे छिंदमच्या अडचणीत वाढ होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत छिंदमने अपशब्द काढल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर संतप्त टीका झाली होती. त्यामुळेच छिंदमला भाजपमधून बाहेरची वाट दाखविण्यात आली होती. त्यानंतर त्याने अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली. धक्कादायक म्हणजे छिंदमवर यावेळी गुन्हा दाखल असून तो तडीपार होता तरीही, या निवडणुकीत जनमत छिंदमच्याच बाजूनेच झुकले. मात्र, आता छिंदमच्या विजयला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आल्याने छिंदमच्या अडचणीत वाढ झाली आहे. महापलिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छिंदम मंगळवारी नगरमध्ये दाखल झाला. त्याने आपल्या कार्यालयात शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

Related posts

“48 तासात प्रकरण पूर्ण संपले नाही तर…”, शरद पवारांचा इशारा

Aprna

गंभीरने मुख्यमंत्री केजरीवालांसह ३ जणांवर ठोकला मानहानीचा दावा

News Desk

मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ?

News Desk