HW News Marathi
राजकारण

भाजप-शिवसेनाचा महामेळावा सुरू, भाषणात सीएसएमटी पूल दुर्घटनेचा उल्लेखही नाही

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती येथे आज (१५ मार्च) भाजप-शिवसेना युतीचा महामेळावा सुरू आहे. युतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा एकाच मंचावर दिसत आहेत. दरम्यान, कालची सीएसएमटी पूल दुर्घटना अगदी ताजी असतानाच सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र महामेळाव्यांमध्ये दंग आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या भाषणांमध्ये इतक्या मोठ्या दुर्घटनेचा साधा उल्लेखही नसणे हे संतापजनक आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

  • शिवसेनेने जनतेचे मुद्दे उचलले.
  • सामान्यांना आधार देणारा दुसरा कोणताही पक्ष नाही.
  • युती झाली नसती तर इतरांना त्याचा फायदा झाला असता.
  • शिवसेना-भाजप सामान्यांना तारणारे पक्ष.
  • टीका कोणावर करायची ? कारण ज्यांच्यावर आता टीका करू तेच उद्या शिवसेना-भाजपमध्ये येतील.
  • युतीमधील संघर्षामुळे कधीही विकासात बाधा येऊ दिली नाही.
  • सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवणे हे आपले काम आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : माध्यमांनाच माझ्या राजीनाम्याची जास्त घाई !

News Desk

शिवसेनेच्या संपर्कात भापजचे अनेक आमदार, नेते | संजय राऊत

swarit

आज शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार; ‘या’ आमदारांना मंत्री पद मिळण्याची शक्यता

Aprna