HW News Marathi
राजकारण

प्रसारमाध्यमांमुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी | विनोद तावडे

मुंबई | मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शुक्रवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांमुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी झाल्याचे विधान केले. यावेळी तावडेंनी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी कोणाला राजकारणात यायचे आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी मोजक्या विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता इतरांनी फारसा रस दाखवला नाही. तेव्हा तावडेंनी प्रसारमाध्यमांनी राजकारणाला बदनाम केल्याचे म्हटले.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असे वक्तव्य करणे हे धक्कादायक आणि संतापजनक आहे. तावडेंच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे यावरुन आता भाजपला नव्या वादाला तोंड द्यावे लागणार आहे. आमदार राम कदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप अगोदरच अडचणीत सापडला आहे. त्यामध्ये आता विनोद तावडेंच्या वक्तव्याची भर पडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचा अनोख्या पद्धतीने निषेध

Gauri Tilekar

शेवटी शिवसेनेलाच हिंदुत्वाची वज्रमूठ आवळावी लागली!

swarit

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का? उर्मिलांनी केले अप्रत्यक्ष कंगनाला टार्गेट 

News Desk
महाराष्ट्र

गणेशोत्सवा दरम्यान चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष भेट

News Desk

मुंबई । दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी एसटी महामंडळाकडून या ही वर्षी एक विशेष भेट देण्यात येणार आहे. यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसटी महामंडळाने दोन हजार २२५ जादा बससेवांची घोषणा केली आहे.

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एसटीकडून ८ ते १० सप्टेंबर या काळात नेहमीच्या गाड्यांव्यतिरिक्त जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवा दरम्यान कोकणात जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांची तिकिटे आधीच फुल झालेली असतात.

एसटी महामंडळ दरवर्षी प्रवाशांसाठी जादा बसची ही सुविधा पुरवितात. एसटी महामंडळाने चिपळूण, मालवण, गुहागर, दापोली, देवरुख, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी, महाड यामार्गावर जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे.

पुण्यातूनही सोडण्यात येतील जादा गाड्या

पुण्यातील स्वारगेट, पिंपरी-चिंचवड, पुणे स्टेशन या बस स्थानकांवरून जादा गाड्या सोडण्यात येणार असून, त्यासाठी आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जास्त लोकांना विशेष सेवा

एकाच ठिकाणाहून कोकणात जाणाऱ्या 40 नागरिकांनी एकत्र मागणी केल्यास त्यांना संबंधित ठिकाणाहून जादा बस सोडण्याची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Related posts

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेत अडचणी

News Desk

ख्रिसमस अन् नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागणार; आज नवी नियमावली जाहीर होणार

Aprna

नागपूरातील गुणवंत पदकांना मुकणार

News Desk