HW News Marathi
राजकारण

एकनाथ शिंदेंकडे कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी

मुंबई | राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या दष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे पहायला मिळत आहे. भाजप, मनसे या पक्षांनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेत देखील विभागप्रमुखांपाठोपाठ आता संपर्क नेतेही बदलले जात आहेत. कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याआधी कोकणतल्या सर्व मतदारसंघांची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती.

सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदेकडे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पूर्वी संपूर्ण कोकणची जबाबदारी असणाऱ्या सुभाष देसाईंकडे आता फक्त रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी असेल. यापुढेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून अनेक महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. शिवसेना नेतृत्वाकडून मुंबईतल्या विभागप्रमुखांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही”, संजय राऊतांची बोचरी टीका

Aprna

Shivsena Dasara Melava 2018 | २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार !

News Desk

राहुल गांधींवर मानहानीचा दावा

Gauri Tilekar