HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : ९० कोटी मतदारांची ‘मते’ ठरविणार देशाचे भविष्य

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकांची आज (१० मार्च) घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत एकूण ९० कोटी मतदार आपल्या मतदानांचा हक्क बजावणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. २०१९ च्या या निवडणुकीत जवळपास ८.४३ कोटी नवे मतदार जोडले गेले आहेत. त्यातील १८ ते १९ वयोगटातील सुमारे १.५ कोटी मतदार करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

१ जानेवारी २०१९ पर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची २२ फेब्रुवारीला प्रसिद्ध केल्यानुसार ८९.७ कोटी मतदारांची नोंद झाल्याची माहिती दिली आहे. यात ४६.५ पुरूष तर ४३.२ कोटी स्त्री मतदारांची नोंदणी झाली आहे. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ८१.५ कोटी मतदारांची नोंदी झाली होती. १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी १० लाख पोलिंग बुथ असणार आहे. २०१४ मध्या ९ लाख पोलिंग बुथ होती यात आता १ लाख पोलिंग बुथची वाढ करण्यात अली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna

अजित पवार राज ठाकरेंची भेट घेणार का ?

News Desk

गांधी कुटुंबियांनी खासगी सुट्यांसाठी आयएनएस विराटचा वापर केला !

News Desk