HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…जळगाव मतदारसंघाबाबत

आपण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल जाणून घेत आहोत. महाराष्ट्रात मतदानाचा एक टप्पा पार पडला तर अजून ३ टप्पे शिल्लक आहे. त्यापैकी दुसरा टप्पा १८ एप्रिलला पार पडणार आहेत. तर २९ एप्रिला शेवटचा म्हणजेच तिसरा टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता सर्व पक्ष, नेते आणि मतदारांनासुद्धा पुढील टप्प्यातील मतदानाची उत्सुकता लागलेली आहे. दुसरा टप्पा उद्या म्हणजे १८ एप्रिलला तर ३ टप्पा २३ एप्रिलला तर २९ एप्रिलला शेवटचा टप्पा पार पडेल.

आज आपण पाहणार आहोत जळगाव मतदार संघाबाबत. जळगाव लोकसभा मतदार संघाअंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यामध्ये जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एंरडोल, चाळीसगाव आणि पाचोरा या मतदारसंघांचा समावेश होतो. जळगावच्या ६ विधानसभा मतदार संघापैकी ५ विधानसभा मतदार संघ हे ग्रामीण असून १ विधानसभा मतदार संघ शहरी भागात येतो.

उमेदवार कोण ?

जळगाव मतदार संघातून यावेळी भाजपकडून उन्मेश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गुलाबराव देवकर, तर वंचित बहुजन आघाडीकडून अंजली बाविस्कर हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच बहुजन समाज पक्षाक़डून राहूल बनसोडे त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण १४ उमेदवार जळगावमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

जळगावमधील २०१४ ची स्थिती

जळगावमधील २०१४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपचे एटी नाना पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ.सतीश पाटील हे उभे होते. त्यापैकी भाजपच्या नाना पाटील यांना ६,४७,७७३ इतकी मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या डॉ. सतीश पाटील यांना २,६४,२४८ इतकी मतं मिळाली होती. तर बहुजन समाज पक्षाचे व्हि टी बागूल यांना १०,८३८ इतकी मतं मिळाली होती. यांची टक्केवारी पहिली तर भाजपला ३७%, राष्ट्रवादी कॉंग्रेसला १५ %, बसपला केवळ १% मतं मिळाली होती.

जळगाव मतदारसंघातील मतदारांची संख्या

जळगावमध्ये १९,०९,७३५ इतके एकूण मतदार आहेत. या मतदारसंघात ९,०८,४२७ इतकी महिला मतदारांची संख्या असून १०,०१,२४९ इतकी पुरुष मतदारांची संख्या आहे.

भाजप आणि कॉंग्रेस यांचे एकसमान वर्चस्व

जळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि कॉंग्रेस यांचे एकसमान वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत एकूण ८ वेळा कॉंग्रेस आणि ६ वेळा भाजपचा उमेदवार येथून निवडून आला आहे. मात्र ११९९ पासून येथे भाजपचाच उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे येथे भाजपचीच सत्ता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे गुलाब देवकर यांच्या बाजूने राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीने आपली ताकद लावली आहे. पण या जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेचेच प्राबल्य आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी जळगाव शहर आणि चाळीसगाव भाजपकडे आहे तर जळगाव ग्रामीण आणि पाचोरा शिवसेनेकडे आहे. अंमळनेरमध्ये अपक्ष आमदार आणि एरंडोल राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील समस्या काही अद्याप सुटलेल्या नसल्याचेही बोलले जाते. ए.टी. पाटील दोन वेळा खासदार झाले पण त्यांनी जळगाव मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा पाहिजे. त्या प्रमाणात पूर्ण केल्या नाही, असेही सांगितले जाते. त्यातच त्यांचे वादग्रस्त छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यांचा पत्ता यावेळी कट झाला. पण ए. टी. पाटील यांनी मेळावा घेऊन आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघावर महाजनांचे वर्चस्व असल्याचेही बोलले जाते. कॉंग्रेस असो वा भाजप महाजनांच्या बळावरच येथे विजय मिळवता आला आहे, असेही एक मत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बांगलादेशी नामशुद्र दलितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार !

News Desk

मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

सत्याचा कोंबडा आरवलाय ‘मौनीबाबा’ने दिलेला सल्ला गांभीर्याने घ्या !

News Desk