HW News Marathi
राजकारण

EXIT POLL : मिझोराममध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी तडजोड होणार का ?

नवी दिल्ली | मिझोरामला काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मिझोरामध्ये अथक प्रयत्न करुन ही भाजपला पाया रोवता आला नाही. जेव्हा संपुर्ण देशात भाजपची लाट असताना देखील मिझोरामध्ये काँग्रेसची सत्ता आली होती. त्यामुळे मिझोरामध्ये यंदाच्या निवडणुकीत फारसा फरक पडेल असे चित्र एक्झिट पोलमध्ये देखील दिसत नाही. त्रिपुरामध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता आली आहे. यंदा मिझोरामध्ये ७५ टक्के इतके मतदान झाले आहे.

मिझोरामध्ये ४० विधानसभेच्या जागासाठी मतदान झाले आहे. टाईम्स नाऊने काँग्रेसला ४० जागांपैकी १६ जागा दिल्या आहेत. तर मिझोराम नेशनल फ्रंटला १८ जागा देण्यात आल्या आहेत. मिझोरामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांना २१ जागांची गरज आहे. मिझोरामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी तडजोड करावी लागणार असल्याची शक्यता एक्झिट पोलने व्यक्त केली आहे. मिझोराममध्ये २०१३ च्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवत ३४ जागा मिळविल्या होत्या.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : हे ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांचे अपयश !

News Desk

ममता बॅनर्जींची ‘ही’ याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna

अजित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे आघाडीत सामील होणार ?

News Desk