HW News Marathi
राजकारण

फडणवीसांच्या मराठा आरक्षण बैठकीकडे या नेत्यांनी फिरवली पाठ !

कोल्हापूर | राज्यात आठवडाभरापासून मराठा आरक्षणावरून भडका उडाला आहे. सरकार आणि मराठा समाजामध्ये निर्माण झालेला हा तिढा सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली आहे. परंतु या बैठकीकडे शाहू छत्रपती यांच्यासह नेतेमंडळी आणि समाजातील विचारवंतांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे हा तिढा कसा सोडवायचा हा विचार भाजपचे नेतेमंडळी करत आहेत. दुसरीकडे चर्चा कसली करता, निर्णय घ्या, असे शाहू छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावले असल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित रहाणार नाहीत हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

सकल मराठा समाजाने ९ ऑगस्टला क्रांतिदिनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली आहे. त्यासाठी शाहू छत्रपती, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांना निमंत्रित केले, पण शाहू छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे नव्हे, तर मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींकडे चर्चेसाठी यावे, अशी परखड भावना सकल मराठा समाजाने व्यक्त केली आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रा. एन. डी. पाटील यांना तर विमान पाठवितो, परंतु बैठकीला या, असे साकडे घालण्यात आले, पण त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगित बैठकीला येण्यास नकार दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा मोठा विजय

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा | अशोक चव्हाण

News Desk

फक्त नरेंद्र मोदीच भारताला महाशक्ती बनवू शकतात !

News Desk