HW News Marathi
राजकारण

अकोल्याच्या जागेवरून युतीत तणाव निर्माण होणार ?

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. तरीही युतीच्या जागा वाटप अद्याप झालेले नाही. जागावाटप झाल्यास अकोल्याच्या जागेवरून युतीत नवा पेज निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. यात अकोल्यातील पाच पैकी चार ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर जिल्ह्यातील एकही मतदारसंघात सेनेचा आमदार नाही. त्यामुळे पाच पैकी किमान दोन मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. त्यात विद्यमान आमदार असलेल्या जागा बदलणार नसल्याचा खुलासा आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

परंतु पाच पैकी दोन जागा शिवसेनेला हव्या आहेत. यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच एक जागा शहरातील असावी अशी अट सुद्धा शिवसेनेने घातली आहे. यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगळे लढले होते. मात्र यंदा पुन्हा ते युतीत लढणार आहे. युतीत लढताना जागावाटपावरून शिवसेनेकडून होणारी जागांची मागणी यावरून युतीत वाद होण्याची शक्यता आहे. किंवा दोन्ही पक्षांना सामंजस्य दाखवून हा मुद्दा सोडवणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादीचा जाहीरनामा, सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत चर्चा करणार !

News Desk

मोहन भागवतांचा राज ठाकरेंनी घेतला समाचार | “थंडीतलं एक उबदार स्वप्न!”

News Desk

शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Aprna