HW News Marathi
राजकारण

मोबाईल घोटाळ्यानंतर आता ३२५ कोटींचा फर्निचर घोटाळा

परळी । राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाचा १०६ कोटीचा मोबाईल घोटाळा उघडकीस आल्यानंतर आदिवासी विभागाचाही ३२५ कोटी रुपयांचा फर्निचर घोटाळा उघडकीस आला असून, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात केलेल्या तक्रारीनंतर आदिवासी विकास मंत्र्यांनी या फर्निचर खरेदीच्या निविदेला तातडीने स्थगिती दिली आहे. धनंजय मुंडेंचे या संदर्भातील भ्रष्टाचार सप्रमाण सिध्द करण्यासंदर्भातील सविस्तर पत्र आणि मंत्र्यांनी त्याला तातडीने दिलेली स्थगिती पाहता या भ्रष्टाचाराच्या आरोपांना एक प्रकारे पुष्टी मिळत आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, आदिवासी विभागाने राज्यातील आदिवासी शाळांमध्ये लागणार्‍या फर्निचर खरेदीसाठी ७ फेब्रुवारीला रोजी जेम्स पोर्टलच्या माध्यमातून ठाणे विभाग, नाशिक, अमरावती व नागपूर या चार विभागासाठी ३२५ कोटी रूपयांच्या स्वतंत्र चार निविदा प्रसिध्द केल्या. सदरील निविदेत नाशिक विभाग व ठाणे विभागात फक्त एकच ठेकेदार (गोदरेज) तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरला तर अमरावती व नागपूर विभागात २ (गोदरेज व स्पेसवुड) ठेकेदार तांत्रिकदृष्टया पात्र ठरलेले होते.

त्यानुसार निविदा प्रक्रियेत ३ पेक्षा कमी निविदाकार असल्याने निविदा स्पर्धात्मक होण्यासाठी प्रथम किमान १ आठवड्याची मुदतवाढ देणे आवश्यक होते, त्यानंतरही ३ निविदाकार न आल्याने दुसर्‍यांदा पुन्हा किमान १ आठवड्याची मुदतवाढ देणे आवश्यक होते, तथापि तसे न करता अशा कोणत्याही मुदतवाढी न देता निविदा अंतिम करून मर्जीतील ठेकेदारांकडून ३२५ कोटी रुपयांची फर्निचर खरेदी करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी आदिवासी विकास मंत्री आणि प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग यांना लिहीलेल्या पत्रात केला आहे.

वास्तविकतः या संपूर्ण निविदा प्रक्रियेतील अटी व शर्थी या स्पर्धा मर्यादित होण्यासाठी व विशिष्ठ ठेकेदारांचे हित जपण्यासाठी टाकण्यात आल्या आहेत. निविदा रक्कमेच्या २५ टक्के इतक्या रकमेचा अनुभव एकाच कार्यारंभ आदेशात असणे आवश्यक केले आहे. म्हणजेच नाशिक विभागात १०० कोटी रूपयांच्या २५ टक्के म्हणजे एकाच कार्यारंभ आदेशाद्वारे किमान २५ कोटी रूपयांचा पुरवठा केला असणे अनिवार्य आहे. या एका अटीमुळे नाशिक विभागात १० वेळा जरी फेर निविदा केल्या तरी हा एकमेव पुरवठादार पात्र होणार आहे. ज्या ठेकेदाराला हे काम द्यायचे आहे त्याच्या सोईनेच या अटी टाकल्याचे मुंडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्वबळाच्या नाऱ्याचा फटका शिवसेनेलाच ?

Gauri Tilekar

उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, ‘लक्ष्मण किला’ येथे जाण्यासाठी रवाना

News Desk

परळीसाठी 100 कोटींचा निधीच्या श्रेयवादावरुन मुंडे बहिण-भाऊ पुन्हा एकदा आमने-सामने 

Aprna
व्हिडीओ

Ayodhya Mediation | का होतोय ‘श्री श्री रविशंकर’ यांच्या नावाला विरोध?

Atul Chavan

अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मध्यस्थ समितीची नेमणूक करण्यात आली आहे. मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असुन या समिती मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक श्री. श्री. रवि शंकर, वादग्रस्त प्रकरणांमध्ये मध्यस्थतेसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ज्येष्ठ वकील फकीर मोहम्मद इब्राहिम खलिफुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाकडुन नेमण्यात आलेल्या या त्रिसदस्यिय समीतीमधील एक सदस्य श्री श्री रविशंकर यांच्या नावाला विरोध होतांना दिसुन येतोय. एआयएमआयएम चे नेते असद्दुदीन ओवेसी यांनी श्री श्री रवि शंकर यांच्या निवडीवर विरोध दर्शविला आहे.

Related posts

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना ! मोठा निर्णय होणार ?

News Desk

कोकणात कुणबी समाज ठरणार गेमचेंजर? Ramdas Kadam, Sanjay Kadam यांच्यासाठी धोक्याची घंटा

Chetan Kirdat

पंकजा मुंडे ओबीसींच्या प्रश्नांमुळे भाजपमध्ये चमकणार ?

News Desk