HW News Marathi
राजकारण

“गेट वेल सून माय फ्रेंड बीजेपी” | संजय राऊत

मुंबई | “शिवसेनेच्या मुखपत्रातून जे छापून येईल, त्याकडे लक्ष्य देऊ नका आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढणार असल्याचा दावा” सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विरोधकांना उद्देशून टीका केली. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यानंतर काहींना मंत्री बनण्याची घाई झाली आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी विरोधकांवर केली.

मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा शिवसेनेने खरपूस समाचार घेतला. “भाजपला झोपेतसुद्धा ‘सामना’ दिसतो आणि ते दचकून उठतात, परावभाची भीती भाजपच्या मुनगंटीवार यांना वाटत आहे, “गेट वेल सून माय फ्रेंड बीजेपी.” असे म्हणत संजय राउत यांनी खोचक टीका केली. तसेच ‘शिवसेनेने काय करायचे हा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, इतर कोणी त्यात लुडबूड करु नये.’ अशा शब्दात राऊत यांनी मुनगंटीवार यांना उत्तर दिले.

२५ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ साली हिंदूत्वाच्या मुद्द्यावर युतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन या दोघांनी युतीची स्थापना केली. तसेच महाराष्ट्रात काँग्रेसला विरोधक म्हणून या युतीची निर्मिती झाली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी संपूर्ण भारतभर मोदींची लाट होती. तेव्हा भाजपकडे एक हाती सत्ता आली. २०१४ च्या निवडणूकमध्ये गेल्या २५ वर्षपासूनची भाजप-शिवसेनेची युती तुटली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५१ जागांवर लढविण्याच्या मुद्दयावर ठाम राहिल्यामुळे ही युती तुटली होती. या निवडणुकीत सेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

“भाजपने केवळ शिवसेनेशी युती नाही तोडली तर हिंदूशी नाते तोडले आहे. आता हिंदूचा घंटानाद काय असतो ते विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ..आता मी मुख्यमंत्री होऊनच दाखवणार, आडवा येईल त्याला आडवा करणार, असा निर्धार व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती फुटीनंतर झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या जाहीर सभेत” त्यांनी भाजपवर टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी“बाळासाहेब असेत तर भाजपला कधीच लाथाडले असते, अशा शब्दांत युती तुटल्यानंतर तोंडसुख घेतले”

महाराष्ट्रातील २०१४च्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा ही मोदी लाट कायम होती. तेव्हा भाजपच्या एक हाती सरकार आली होती. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाला आर्थिकदृष्ट्या खूप मोठे नुकसान झाले. त्यानंतर संपूर्ण देशाला मोदींनी बँकेच्या रागेत उभे केले होते. मग GST लागू केल्यामुळे सुद्धा व्यापारी वर्गाने भाजप विरोधात नाराजीचा सुर आवळला. यांच्या काळात महाराष्ट्रात मराठा मोर्चा असो वा शेतकऱ्यांचा लाँग मार्च मोर्चा असे सरकार विरोधात विराट मोर्चे देखील काढले गेले. तसेच विजय माल्या आणि नीरव मोदी हे देशाला चूना लावून परदेशात फरार झाले.

सत्य परिस्थतीत पाहता मोदी लाट नाहीशी झाली आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांच्या पोटनिवडणुकीत यांचे चित्र स्पष्ट दिसून आले. यानंतर मोदी सरकारला सुद्धा कळून चूकले आहे की, प्रादेशिक पक्षाला सोबत घेतल्याशिवाय त्यांना देशात सत्ता स्थापन करणे शक्या होणार नाही. २०१४मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर जो आडमुटेपणा त्यांच्यात आला होता. तो आडमुटेपणा आता भाजपमध्ये राहिला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून ह्यांना एक प्रकारचा माज आलाय !

News Desk

Raj Thackeray ED Live Updates : साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे बाहेर

News Desk

‘शिवाजी पार्क’वरील शिंदे गटाच्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने काय म्हटले…

Aprna