HW News Marathi
राजकारण

कुमारस्वामींचे सरकार कोसळणार ?

बंगळुरू | कर्नाटक निवडणुकीनंतर कोणता पक्ष सत्ता प्रस्थापित करणार यावरुन कर्नाटकमध्ये राजकीय युद्ध रंगल्याचे पहायला मिळाले होते. सत्तेत आपणच येणार असे म्हणत भाजपाने येडीयुरुप्पा यांना मुख्यमंत्री करत अवघ्या अडीच दिवसांचे सरकरा स्थापन केले होते. परंतु भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी नवीन शक्कल लढवत जेडीएस आणि कॉंग्रेसने संयुक्त सरकार स्थापन केले. सत्ता स्थापन करताना जेडीएसचे कुमारस्वानी यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री पद दिले गेले. परंतु मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना कुमारस्वामी येत्या ५ जुलै ला राज्याचे बजेट सादर करणार आहेत. परंतु या बजेटच्या सादरीकरणापुर्वी हे सरकार कोसळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

संयुक्त सरकार असताना खातेवाटपावरून नाराज झालेल्या आमदारांमुळे जेडीएस-काँग्रेसचे सरकार कोंडीत सापडले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेते याबाबत चर्चेने मार्ग काढायला तयार नाहीत. त्यामुळे नाराज नेते भाजपशी संपर्क करत असल्याची चर्चा आहे. दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारे घडत असलेल्या या राजकीय नाट्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप येणार असून अवघ्या चार आठवड्यांचे कुमारस्वामी यांचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला सबलीकरणाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार पवारांनी गमावला !

News Desk

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी शिवतीर्थावरच होणार !

News Desk

“महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल”, शरद पवारांचा विश्वास

Aprna
राजकारण

कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली | नरेंद्र मोदी  

News Desk

मुंबई | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यामुळे कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली असा आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती या आणीबाणीला आज ४३ वर्षे पुर्ण होत आहेत. या निमित्ताने भाजप सरकार आज २५ जून हा देशभर काळा दिवस पाळणार आहे. त्यानिमित्त आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन ४३ वर्षांपुर्वी इंदिरा गांधी यांनी केलेल्या आणीबाणी विषयी भाष्य केले.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, संविधानाला ६० वर्षे पुर्ण झाली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तरुणाईला घटनेप्रती आस्था निर्णाण व्हावी म्हणून संविधान आंबारीत ठेऊन मी रॅली काढली होती. आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी नेहमीच पावले उचलली आहेत असेही ते यावेळी बोलताना म्हणालेत.

तसेच मोदींनी यावेळी बोलताना कॉंग्रेसवर सडकून टिका केली आहे. राजीव गांधी यांनी मीडियासाठी काय केले ? कोणते कायदे आणले ? असे अनेक प्रश्न मोदींनी यावेळी बोलताना उपस्थित केले. काँग्रेसच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर एका परीवारासाठी संविधानाचा दुरुपयोग करण्यात आला असा टोलाही मोदींनी यावेळी बोलताना कॉंग्रेसला लगावला.

Related posts

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘पाच’ महत्त्वाच्या योजना

News Desk

शाहिद आफ्रिदीचे ‘चांदतारे’, सामनामधून ठाकरेंनी घेतला समाचार

News Desk

“ताई, मी सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो”, मुख्यमंत्र्यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

Aprna