HW News Marathi
राजकारण

अयोध्येत गेल्याने त्या दोघांना ‘राम’ पावले असावेत !

मुंबई | “इतके दिवस सारखं काही ना काही चाललं होतं. अर्थात एक बरं झालं. वेगवेगळी चर्चा सुरु होती. आता पुन्हा जवळीक वाढू लागली आहे. अयोध्येत गेल्यामुळे त्या दोघांना श्रीराम पावले असावेत”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सेना-भाजपला लगावला.

विधानसभा उपाध्यक्ष पदी विजयराव औटी यांची निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. विजयराव औटी यांचे अभिनंदन करतानाच अजित पवार यांनी सेना-भाजपाच्या सध्या वाढलेल्या जवळीकतेवर भाष्य करतानाच काही मिश्किल चिमटेही काढले.

“आम्ही सर्वधर्मसमभाव मानणारे आहोत. त्यामुळे आम्ही रामालाही मानतो आणि सर्वांनाच मानतो. शेवटी आपल्याला अठरापगड जातीला बरोबर घेवून जाण्याचा प्रयत्न करायचा आहे”, असेही अजित पवार म्हणाले.

राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून किती त्यांच्या बोलण्यामध्ये फरक पडला आहे. किती सगळयांना बरोबर घेवून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वी त्यांचे विचार काय होते. पूर्वी त्यांचे वेगळे विचार होते. वेगळा विदर्भ झाला पाहिजे असे ते म्हणायचे. परंतु आज ते एक महाराष्ट्र राहिला पाहिजे म्हणत आहेत. एकत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कसे असते हे ते अनुभवत आहेत. म्हणून त्यांना ते आता बरे वाटायला लागले आहे. त्यामुळे त्यांना वेगळा विदर्भ नकोय, असा जबरदस्त टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जितेंद्र आव्हाडचे प्रकाश आंबेडकर यांना उत्त्तर

News Desk

महिला दिना निमित्ताने विधानसभेत महिला सदस्य मांडणार लक्षवेधी

Aprna

भाजप सरकारने तोट्यातल्या कंपनीसाठी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकू नये | संजय निरुपम

News Desk
राजकारण

महाआघाडीमध्ये आता चंद्रबाबू नायडू यांचा समावेश

Gauri Tilekar

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली. अखेर काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्ष या दोन्ही पक्षांकडून एकत्र येण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे या पक्षांनी म्हटले आहे. प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. आता या महाआघाडीमध्ये तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडूचंद्रबाबू नायडू यांचा समावेश झाला आहे.

राहुल गांधी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडले होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या दोघांमधील भेट झाली असल्याचे अंदाज व्यक्त केला जात होताच. त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षांनी आता ते एकत्र येत असल्याची घोषणा केली आहे.

Related posts

“लवकरच मुंबई पालिकेसह विधानसभा निवडणुका घ्याव्यात” – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk

काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी रघुराम राजन करणार मदत ?

News Desk