HW News Marathi
राजकारण

अयोध्येत गेल्याने त्या दोघांना ‘राम’ पावले असावेत !

मुंबई | “इतके दिवस सारखं काही ना काही चाललं होतं. अर्थात एक बरं झालं. वेगवेगळी चर्चा सुरु होती. आता पुन्हा जवळीक वाढू लागली आहे. अयोध्येत गेल्यामुळे त्या दोघांना श्रीराम पावले असावेत”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सेना-भाजपला लगावला.

विधानसभा उपाध्यक्ष पदी विजयराव औटी यांची निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. विजयराव औटी यांचे अभिनंदन करतानाच अजित पवार यांनी सेना-भाजपाच्या सध्या वाढलेल्या जवळीकतेवर भाष्य करतानाच काही मिश्किल चिमटेही काढले.

“आम्ही सर्वधर्मसमभाव मानणारे आहोत. त्यामुळे आम्ही रामालाही मानतो आणि सर्वांनाच मानतो. शेवटी आपल्याला अठरापगड जातीला बरोबर घेवून जाण्याचा प्रयत्न करायचा आहे”, असेही अजित पवार म्हणाले.

राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून किती त्यांच्या बोलण्यामध्ये फरक पडला आहे. किती सगळयांना बरोबर घेवून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वी त्यांचे विचार काय होते. पूर्वी त्यांचे वेगळे विचार होते. वेगळा विदर्भ झाला पाहिजे असे ते म्हणायचे. परंतु आज ते एक महाराष्ट्र राहिला पाहिजे म्हणत आहेत. एकत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कसे असते हे ते अनुभवत आहेत. म्हणून त्यांना ते आता बरे वाटायला लागले आहे. त्यामुळे त्यांना वेगळा विदर्भ नकोय, असा जबरदस्त टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या… पंतप्रधान नरेंद्र मोदींची किती आहे संपत्ती

News Desk

राफेलसंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधींनी देशाची माफी मागावी !

News Desk

‘आधे इधर आधे उधर, बाकी मेरे पीछे आओ’ अशी राज ठाकरेंची सध्याची अवस्था !

News Desk
राजकारण

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

News Desk

मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, तेव्हापासून आजपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले होते. भाजप सरकार आलं आणि चौथं वर्षही संपलं म्हणजे भाजप-सेना सरकारला या अपत्याला जन्माला घालायला ४ वर्षे लागली”, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची आज निवड करण्यात आली आहे. त्यावेळी उपाध्यक्ष विजय औटी यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली आहे.

“विजय औटी हे उपाध्यक्ष झाले याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांना पहिल्यांदाच हे पद दयायला हवे होते. त्यामुळे अधिक आनंद झाला असता. विजयराव औटी हे मी जेव्हा राजकारणातही नव्हतो तेव्हा समाजवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. अतिशय तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांना मी ओळखतो. ते अरुण मेहता, सुरेश कलमाडी यांच्यासोबत ते काम करत होते”, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

“विजयराव औटी यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. हे कुटुंबच समाजाशी जुळलेले आहे. औटी हे जुने समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली याचा आनंद आहे”, असे म्हणत अजित पवार यांनी पक्षातर्फे विजय औटी यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ?

News Desk

दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी फटके मुख्यमंत्र्यांनाच का ?

News Desk

संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन

News Desk