HW News Marathi
राजकारण

अयोध्येत गेल्याने त्या दोघांना ‘राम’ पावले असावेत !

मुंबई | “इतके दिवस सारखं काही ना काही चाललं होतं. अर्थात एक बरं झालं. वेगवेगळी चर्चा सुरु होती. आता पुन्हा जवळीक वाढू लागली आहे. अयोध्येत गेल्यामुळे त्या दोघांना श्रीराम पावले असावेत”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सेना-भाजपला लगावला.

विधानसभा उपाध्यक्ष पदी विजयराव औटी यांची निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. विजयराव औटी यांचे अभिनंदन करतानाच अजित पवार यांनी सेना-भाजपाच्या सध्या वाढलेल्या जवळीकतेवर भाष्य करतानाच काही मिश्किल चिमटेही काढले.

“आम्ही सर्वधर्मसमभाव मानणारे आहोत. त्यामुळे आम्ही रामालाही मानतो आणि सर्वांनाच मानतो. शेवटी आपल्याला अठरापगड जातीला बरोबर घेवून जाण्याचा प्रयत्न करायचा आहे”, असेही अजित पवार म्हणाले.

राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून किती त्यांच्या बोलण्यामध्ये फरक पडला आहे. किती सगळयांना बरोबर घेवून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वी त्यांचे विचार काय होते. पूर्वी त्यांचे वेगळे विचार होते. वेगळा विदर्भ झाला पाहिजे असे ते म्हणायचे. परंतु आज ते एक महाराष्ट्र राहिला पाहिजे म्हणत आहेत. एकत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कसे असते हे ते अनुभवत आहेत. म्हणून त्यांना ते आता बरे वाटायला लागले आहे. त्यामुळे त्यांना वेगळा विदर्भ नकोय, असा जबरदस्त टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केजरीवाल यांच्यावर अज्ञात व्यक्तीने मिरचीपूड फेकली

News Desk

शिवस्मारक हे पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात !

News Desk

क्रिकेट विश्वाचा पहिला सम्राट हरपला | आठवले

News Desk