HW News Marathi
राजकारण

भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची

मुंबई | आज या देशामध्ये पाकिस्तान मधून साखर आली आहे, या देशातल्या लाखो-करोडो शेतकऱ्यांनी ऊस पिकवला, आज त्या उसातून साखर मोठ्या प्रमाणात या देशात निर्माण झाली आहे. ती गोडाऊन मध्ये असताना पाकिस्तान मधून साखर आणण्याचा केंद्र सरकारने जो घाट घातला आहे, त्याचा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निषेध केला आहे.

श्री. मोदीजी जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा पाकिस्तानला लव्हलेटर न लिहता ५६ इंचाची सीना दाखवावा लागेल अस म्हणत होते आज तो ५६ इंचाचा सीना १२ इंचाचा झाला आहे काय ? असा सवाल उपस्थित करतानाच पाकिस्तान रोज सरहद्दीवर आपल्या जवानांचा खून करतोय, रक्त सांडतोय तो पाकिस्तान आज आपल्या देशात साखर पाठवतोय अन ती साखर आम्ही गोड म्हणून खायची का असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्या साखरे मध्ये देशातील लाखो सैनिकांचे रक्त आहे म्हणून आम्हाला एक कण ही साखर नको असे ते म्हणाले.

ज्या देशातील जनतेने तुमच्यातील देशप्रेम पाहून तुम्हाला निवडून दिले त्यांना आता मोदींचे देशप्रेम दिसू लागले असल्याचा टोला ही त्यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांची तुलना थेट श्री रामाशी करून दिल्या भाजपच्या ‘या’ आमदाराने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Aprna

उद्या मोदींनी भाजपच्या प्रचारात ट्रम्प, पुतीन यांना उतरवले तर चालेल काय ? 

News Desk

शिवस्मारकाच्या प्रकल्पास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

swarit