HW News Marathi
राजकारण

Shivsena Dasara Melava 2018 | सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दस-या मेळाव्याच्या निमित्ताने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी पाकिस्तान व सर्जिकल स्ट्राइक संदर्भात बोलताना केंद्र सरकारच्या धोरणावर देखील उद्धव यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, सतत वल्लभभाई पटेलांचे नाव घेता. अहो मग तुम्ही काय करता, पाकिस्तानचे तुकडे करण्याऐवजी फक्त सोईचे राजकारण केले जात आहे. जर तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले आहे.

राज्य दुष्काळाने होरपळत आहे. हीच परिस्थिती कर्नाटकमध्ये देखील असलेली पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात केवळ दुष्काळावर चर्चा होत आहे पण तिकडे कर्नाटक सरकारने जुन्याच निकषाने दुष्काळ जाहीर केला. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला नाही तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचेही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशा ठिकाणी वार केला कि पाकिस्तानची बोलती बंद झाली !

News Desk

अयोध्या राम मंदिराबाबत ११ डिसेंबरनंतर ठोस निर्णय होईल !

News Desk

अक्षय तृतीयेला शिबीर रद्द, आमदार पाटील यांच्या मागणीला यश

News Desk