HW News Marathi
राजकारण

केंद्रात जर पुन्हा मोदींचे सरकार आले तर त्याला कारणीभूत राहुल गांधीच !

नवी दिल्ली | “केंद्रात जर पुन्हा नरेंद्र मोदींचे सरकार आले तर त्याला कारणीभूत काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच असतील”, असे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. “राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप युतीला, केरळमध्ये डाव्यांना, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आणि दिल्लीत आम आदमी पक्षाला नुकसान पोहोचवत आहेत”, अशी टीका देखील अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल बोलत होते.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी ही टीका केली. दिल्लीत दोन दिवसांनी मतदान होणार असून त्याआधीच अरविंद केजरीवाल यांनी हे वक्तव्य केल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. “सध्या जे चित्र दिसत आहे त्यावरुन असे वाटते कि काँग्रेस भाजपशी नव्हे तर विरोधकांशीच लढत आहे. जुळून आलेल्या अनेक गोष्टी काँग्रेसमुळे बिघडत आहेत”, असा आरोप देखील अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदींकडे लोकांना दाखविण्यासाठी कोणतेही काम नाही. प्रत्येक क्षेत्रात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच ते लष्कराचे साहाय्य घेत आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना सत्तेतपासून दूर ठेवणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही या दोघांना सोडून अन्य कोणालाही समर्थन देऊ”, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहा यांची रथयात्रा पुन्हा अडली

News Desk

राहुल गांधींच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

News Desk

श्रीलंकेसमोरील आव्हान कठीणच, मात्र जगासमोरही एक नवा धोका !

News Desk