HW News Marathi
राजकारण

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, तेव्हापासून आजपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले होते. भाजप सरकार आलं आणि चौथं वर्षही संपलं म्हणजे भाजप-सेना सरकारला या अपत्याला जन्माला घालायला ४ वर्षे लागली”, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची आज निवड करण्यात आली आहे. त्यावेळी उपाध्यक्ष विजय औटी यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली आहे.

“विजय औटी हे उपाध्यक्ष झाले याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांना पहिल्यांदाच हे पद दयायला हवे होते. त्यामुळे अधिक आनंद झाला असता. विजयराव औटी हे मी जेव्हा राजकारणातही नव्हतो तेव्हा समाजवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. अतिशय तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांना मी ओळखतो. ते अरुण मेहता, सुरेश कलमाडी यांच्यासोबत ते काम करत होते”, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

“विजयराव औटी यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. हे कुटुंबच समाजाशी जुळलेले आहे. औटी हे जुने समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली याचा आनंद आहे”, असे म्हणत अजित पवार यांनी पक्षातर्फे विजय औटी यांचे अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निवडणूक आयोगाने अमित शहांच्या इशाऱ्यावर प्रचारबंदी लागू केली !

News Desk

ईडी-सीबीआयचे अधिकारी मोदी-शहांचे कार्यकर्ते !

News Desk

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, शहाणपणा शिकवण्याची गरज नाही !

News Desk
मुंबई

टी सीरीज तर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या व्हिडीओ संदर्भात काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न

News Desk

मुंबई | टी सीरीज तर्फे युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर प्रकाशीत करण्यात आलेल्या व्यवसायिक व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत म्हणाले की, या अगोदरही अशाच त-हेचे काही व्हिडोओ टी सीरीज कंपनीतर्फे प्रकाशित करण्यात आले होते. पंरतु राज्याच्या इतिहासात प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक अधिकारी व पोलीस नाचता गाताना प्रथमच दिसलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे राज्यातील 12 कोटी जनतेला जवाबदेह असल्याने काँग्रेस पक्ष यासंदर्भात काही मुलभूत प्रश्न उपस्थित करित असून मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करत आहे.

काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

  • टी सीरीज या कंपनीशी शासनाचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कौटुंबीक नाते आहे? यामधील आदान प्रदान काय आहे?
  • सदर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र शासन अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे शासनाचा सदर कंपनीशी करार झाला आहे का? असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा.
  • जर शासनाशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली गेली?
  • मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिका-यांनी या व्हिडीओसाठी मानधन घेतले आहे का?कलाकारांचे मानधन कोणी दिले?व या व्हिडीओचा खर्च कोणी केला?
  • शासकीय अधिका-यांना सदर व्हिडीओमध्ये काम करण्याचे आदेश कोणी दिले?सदर काम त्यांच्या कार्यकक्षेत येते का?
  • वर्षा हे शासकीय निवासस्थान चित्रीकरणासाठी वापरण्याची परवानगी कोणी दिली?
  • सदर व्हिडीओ खासगी असेल तर अशा खासगी प्रकल्पात अधिका-यांनी स्वखुशीने काम केले की, त्यांना काम करण्याचे आदेश दिले?
  • स्वतःच्या अतिव्यस्त कार्यक्रमातून व अतिमहत्त्वाच्या जबाबदारीतून वेळ काढून मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी या व्हिडीओच्या चित्रीकरणासाठी वेळ दिला तसेच इतर महत्त्वाच्या अधिका-यांना देखील त्यांचे काम बाजूला ठेवून यामध्ये समाविष्ठ केले गेले याचा अर्थ सदर व्हिडीओच्या माध्यमातून मुंबईच्या नदीसारखे जटील प्रश्न सोडवले जाऊ शकतात अशी मुख्यमंत्र्यांची धारणा आहे का?
  • असल्यास राज्यात 13 हजारांपेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करित आहेत. त्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळ्या लावाव्या लागल्या अशा व बेरोजगारी, कुपोषण,कोलमडलेली अर्थव्यवस्था,वाढलेली महागाई, इत्यादी सारख्या महत्त्वाच्या विषयांवर शासन असेच व्हिडीओ बनवणार आहे का?
  • अशा व्हिडीओ मध्ये काम करण्याकरिता त्या त्या विषयाशी संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी व मंत्री यांना अभिनयाचे व नृत्याचे प्रशिक्षण सरकार देणार आहे का?

Related posts

खड्यात उतरून शिवसैनिकांचे आंदोलन  

News Desk

घाटकोपर ते वर्सोवा रोडदरम्यान मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल

News Desk

अँटॉप हिल स्फोट प्रकरणात दोन जणांना अटक

News Desk