HW News Marathi
राजकारण

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, तेव्हापासून आजपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले होते. भाजप सरकार आलं आणि चौथं वर्षही संपलं म्हणजे भाजप-सेना सरकारला या अपत्याला जन्माला घालायला ४ वर्षे लागली”, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची आज निवड करण्यात आली आहे. त्यावेळी उपाध्यक्ष विजय औटी यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली आहे.

“विजय औटी हे उपाध्यक्ष झाले याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांना पहिल्यांदाच हे पद दयायला हवे होते. त्यामुळे अधिक आनंद झाला असता. विजयराव औटी हे मी जेव्हा राजकारणातही नव्हतो तेव्हा समाजवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. अतिशय तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांना मी ओळखतो. ते अरुण मेहता, सुरेश कलमाडी यांच्यासोबत ते काम करत होते”, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

“विजयराव औटी यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. हे कुटुंबच समाजाशी जुळलेले आहे. औटी हे जुने समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली याचा आनंद आहे”, असे म्हणत अजित पवार यांनी पक्षातर्फे विजय औटी यांचे अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही !

News Desk

उद्याच सादर होणार मराठा आरक्षणाचा एटीआर

News Desk

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी

Aprna
मनोरंजन

FlashBack2018 : मुंबईकरांसाठी ‘या’ घटना ठरल्या धक्कादायक

News Desk

२०१८ च्या सुरुवातीपासूनच अनेक घटना मुंबईकरांसाठी धक्कादायक ठरल्या सुरुवातीपासून अगदी डिसेंबरच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुंबईकरांसाठी धक्कादायक ठरलेल्या घटनांचा थोडक्यात आढावा.

पवईत क्रेन कोसळून तीन कामगारांचा मृत्यू

२०१८ च्या पहिल्याच दिवशी मुंबईत अपघात झाला. नव्या वर्षात तरी अपघाताची मालिका संपेल असे वाटणा-या मुंबईकरांचा यावेळी स्पष्ट भ्रम निरास झाला. नववर्षाचे स्वागत होत असतानाच पवई येथे क्रेनचा लोखंडी रहाट तुटून झालेल्या विचित्र अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.

भारत पेट्रोलिअमच्या कंपनीत स्फोट

मुंबईतील चेंबूर येथे असलेल्या भारत पेट्रोलिअमच्या कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली होती. बुधवारी ८ ऑगस्ट २०१८ रोजी लागलेल्या या आगीत कंपनीचे ४५ कामगार जखमी झाले होते. सुदैवाने सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.

घाटकोपरमध्ये चार्टड विमान दुर्घटना

घाटकोपर परिसरात गजबजलेल्या ठिकाणी विमान कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक प्रदीप राजपूत, सहवैमानिक भाटिया, इंजिनीअर सुरभी, तंत्रज्ञ मनोज पांडे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत एका पादचा-यालाही प्राण गमवावे लागले होते. मानवी वस्तीमध्ये कोळलेल्या या विमानामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अंधेरी पूल दुर्घटना

गतवर्षीच्या एल्फिन्स्टन रोड स्थानक पूल दुर्घनेनंतर यंदा झालेली अंधेरी पूल दुर्घटना मुंबईकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरली. अंधेरी रेल्वे स्थानकानजीक असलेला पादचारी पूल कोसळून एक महिला मृत्युमुखी पडली होती. या दुर्घटनेमुळे तब्बल १३ तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होता.

गणेश विसर्जनादरम्यान बोट बुडाल्याने अपघात

गणेश विसर्जनादरम्यान अपघातात ६ ते ८ जण पाण्यात बुडाले होते. यावेळी पाण्यात बुडलेल्या लोकांपैकी ५ वर्षीय साईश मर्दे या लहान मुलाचा शोध लागला नव्हता. त्यानंतर सलग सहा दिवशी नौदल आणि तटरक्षक दल हे हेलिकाॅप्टरच्या मदतीने साईशचा शोध घेत होते. अखेर राजभवनाजवळच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळला होता.

शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटना

बहुचर्चित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जात असलेल्या एका स्पीडबोटला अपघात झाला होता. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले होते. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन ही बोट जात होती. या दुर्घटनेत बोटीतील सिद्धेश पवार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता.

परेलच्या क्रिस्टल प्लाझा इमारतीला आग

परळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या तळमजला अधिक सतरा या क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्याला आग लागली होती. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता.

अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला भीषण आग

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या कामगार रुग्णालयाला आग लागली होती. या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास १४६ जण जखमी झाले होते.

चेंबूर सरगम सोसायटी आग दुर्घटना

चेंबूर मधील सरगम ​​सोसायटीला आग लागल्याची घटना घडली होता. चेंबूरच्या टिळकनगर येथील गणेश गार्डनजवळ असलेल्या या इमारतीत लागलेल्या आगीत बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाला अडथळा आल्यामुळे आग विझविण्यासाठी विलंब लागला होता.

साधना इंडस्ट्रीअल इस्टेटला आग

वरळीतील बीडीडी चाळीजवळील साधना इंडस्ट्रीअल इस्टेट या तीन मजली इमारतीला २९ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आग लागली होती. यामध्ये अग्निशमन दलाचे ११ जवान जखमी झाले होते.

 

 

 

Related posts

Ganesh Chaturthi 2018 | ‘खड्डे आणि वाहतूक कोंडीचा’ देखावा साकारत गणेश भक्ताने मांडली व्यथा

News Desk

पद्मावत’ सिनेमावर हरियाणात बंदी

swarit

Mahatma Gandhi Death Anniversary | महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर काय म्हणाले पंडित नेहरू ?

News Desk