HW News Marathi
राजकारण

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, तेव्हापासून आजपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले होते. भाजप सरकार आलं आणि चौथं वर्षही संपलं म्हणजे भाजप-सेना सरकारला या अपत्याला जन्माला घालायला ४ वर्षे लागली”, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची आज निवड करण्यात आली आहे. त्यावेळी उपाध्यक्ष विजय औटी यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली आहे.

“विजय औटी हे उपाध्यक्ष झाले याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांना पहिल्यांदाच हे पद दयायला हवे होते. त्यामुळे अधिक आनंद झाला असता. विजयराव औटी हे मी जेव्हा राजकारणातही नव्हतो तेव्हा समाजवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. अतिशय तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांना मी ओळखतो. ते अरुण मेहता, सुरेश कलमाडी यांच्यासोबत ते काम करत होते”, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

“विजयराव औटी यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. हे कुटुंबच समाजाशी जुळलेले आहे. औटी हे जुने समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली याचा आनंद आहे”, असे म्हणत अजित पवार यांनी पक्षातर्फे विजय औटी यांचे अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जयकुमार रावलच्या पदाचा राजीनाम्याची मागणी – नबाव मलिक

News Desk

अमृता फडणवीस यांचा ‘दीवानी मस्तानी’ गाण्यावर भन्नाट डान्स

News Desk

#Vidhansabha2019 | मनसेची पहिली उमेदवार यादी जाहीर

News Desk
राजकारण

भगवान हनुमान हे दलित नाही, ते तर आदिवासी होते !

News Desk

लखनौ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचे वादग्रस्त विधान केल्यानंतर या प्रकरणाची राजकारणात जोरदार चर्चा रंगलेली होती. हे प्रकरण शांत होत असतानाच आता अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय हनुमान यांच्या संदर्भात एक धक्कादायक विधान केले आहे. ‘हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते’ असल्याचे साय यांनी म्हटले आहे.

अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असते. कुडूक या अनुसूचित जातीमध्ये तिग्गा नावाचे गोत्र आहे. ज्याचा अर्थ वानर असा होतो. तसेच अनुसूचित जातींमध्ये हनुमान आणि गिधाड अशी देखील गोत्रे आहेत, असे साय यांनी म्हटले आहे. प्रभू श्रीरामाने ज्या दंडकारण्यात सैन्य गोळा केले. त्यामध्ये अनुसूचित जातींचे लोक होते. त्यामुळे हनुमान हे दलित नव्हे तर अनुसूचित जातीचे होते, असे नंदकुमार साय यांनी म्हटले आहे.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…जळगाव मतदारसंघाबाबत

News Desk

भाजप-सेनेच्या युतीसाठी स्थानिक पातळीवर ताकद लावा, कामाला लागा !

News Desk

शाहिद आफ्रिदीचे ‘चांदतारे’, सामनामधून ठाकरेंनी घेतला समाचार

News Desk