HW News Marathi
राजकारण

महिलांना 33 टक्के आरक्षण मिळायला हवे

नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवार १८ जुलैपासून सुरू होत आहे. या पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक भाजपा सरकारने आणावे. या विधेयकाला काँग्रेस बिनशर्त पाठिंबा देईल, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळायला हवे, असे राहुल यांनी सांगितले आहे.

यासंबंधी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही गेल्यावर्षी केंद्र सरकारला पत्र लिहले होते. महिला आरक्षण विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. 1996 मध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कार्यकाळात हे विधेयक संसेदत मांडले होते. 2010 मध्ये राज्यसभेत हे विधेयक मंजूर होऊनही लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजम खान यांनी माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा कट रचला !

News Desk

वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार! – आदित्य ठाकरे 

Aprna

प्रियांका गांधींच्या ट्विटर अकाऊंटला जोरदार प्रतिसाद

News Desk