HW News Marathi
राजकारण

Loksabha Election 2019 | तारखा जाहीर होण्यापूर्वीच प्रचारसभांची तयारी

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने देशातील सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना फेब्रुवारी अखेरपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी निवडणूक आयोगाकडून मात्र तयारीला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असून एप्रिल-मे महिन्यात निवडणूक पार पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार पूर्वीच देशातील दोन महत्त्वाचे राजकीय पक्ष काँग्रेस आणि भाजप यांनी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात प्रचारसभांचे आयोजन केले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे लक्ष हे महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असणाऱ्या उत्तर प्रदेशवर असेल तर पंतप्रधान मोदी ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये तीन प्रचारसभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने देशातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणूक आयोगाकडून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. म्हणून काँग्रेस आणि भाजपकडून प्रचारसभांच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे लक्ष ८० जागांच्या उत्तर प्रदेशाकडे आहे. म्हणूनच पक्षाकडून याची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या मुसक्या आवळल्या

News Desk

भविष्यकाळात एससी, एसटीचे आरक्षण रद्द करणार का ?

News Desk

‘बजेट’ मतांचेच असले तरी देशातील सगळय़ांसाठी दिलासादायक

News Desk