HW News Marathi
राजकारण

…म्हणून प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आली ३ वेळा शपथ घेण्याची वेळ

नवी दिल्ली | लोकसभेत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आले. सोमवारपासून (१७ जून) ‘मोदी सरकार २.०’ पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. दरम्यान, यावेळी भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या शपथ ग्रहणावेळी त्यांच्या नावावरून विरोधकांनी लोकसभेत मोठा गोंधळ घातला. प्रज्ञा ठाकूर यांनी शपथ घेण्यास सुरुवात करताच विरोधकांकडून एकच गोंधळ सुरु झाला. त्यामुळे, प्रज्ञा ठाकूर यांना तब्बल ३ वेळा शपथ घेण्याची वेळ आली.

“मी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी”, अशी सुरुवात करताच विरोधकांनी प्रज्ञा ठाकूर यांना थांबवत त्यांच्या नावावरून आक्षेप घेतला. प्रज्ञा ठाकूर यांनी आपले पूर्ण नाव घ्यावे, आपल्या वडिलांचे नाव घ्यावे, अशी जोरदार मागणी करत विरोधकांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला. त्यावर स्पष्टीकरण देत “हेच माझे पूर्ण नाव आहे”, असे प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या. मात्र, विरोधकांकडून मागणी होतच राहिली. दुसऱ्यांदा शपथ घेताना देखील असाच गोंधळ झाला त्यावेळी प्रोमेट स्पीकर यांनी चक्क प्रज्ञा ठाकूर यांना त्यांचे विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यास सांगितले. त्यानंतर अखेर प्रज्ञा ठाकूर यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिग बॉस फेम सपना चौधरीचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

राहुल गांधींवर मानहानीचा दावा

Gauri Tilekar

आम्ही जसे ब्रिटिशांविरुद्ध लढलो, जिंकलो त्याचीच पुनरावृत्ती आताही करू !

News Desk