HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार !

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार असून त्यापुढील सर्व निवडणुका वंचित आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “देशातील राजकारणात सध्या दबावतंत्राचा वापर सुरु आहे. स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबावर केलेले जमीन घोटाळ्याचे आरोप हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

“गांधी कुटुंबावर जमीन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या भाजपला जर आधीच या घोटाळ्यांची माहिती होती तर त्यांनी कारवाई का केली नाही ?”, असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला आहे. माझी भारिप बहुजन महासंघाशी जरी भावनिक नाते असले तरी पुढची वाटचाल ही वंचित बहुजन आघाडीतून करणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुरू; पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार सुनावणी

Aprna

निजामाची चाटुगिरी थांबवली नाही,तर तुमचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk

भाजप-शिवसेनेची युती झाली तर स्वाभिमान पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र लढेल !

News Desk