HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : चौकीदार हे गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असतात !

नवी दिल्ली | “योगी आदित्यनाथ फक्त मोठमोठ्या बाता मारतात, परंतु राज्यात विकास झालेला दिसतच नाही. ५६ इंच छातीवाले रोजगार का उपलब्ध करून देऊ शकत नाही ? कारण त्यात तुम्ही असक्षम आहात. गेल्या ५ वर्षात केंद्राने काहीही केले नाही”, अशी टीका काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे चौकीदार हे गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असतात असा टोलाही यावेळी प्रियांका गांधी यांनी लगावला आहे. त्या सीतामढीमध्ये बोलत होत्या.

“गरीब शेतकऱ्यांचे चौकीदार नसतात. चौकीदार हे श्रीमंतांचे असतात”, असाही टोला यावेळी प्रियांका गांधी यांनी लगावला आहे. “तुम्ही जर इतके ताकदवान आहात, तुमची ५६ इंचाची छाती आहे. तर मग तुम्ही देशात रोजगारसंधी उपलब्ध करून का देऊ शकला नाहीत ? कारण त्यात तुम्ही असक्षम ठरलात. तुमचे सरकार कमकुवत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये केंद्राने काहीही केलेले नाही”, असे प्रियांका गांधी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हणाल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना राजकीय पक्ष एकमेकांवर टोकाची टीका करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे वारंवारच भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. दरम्यान, आता प्रियांका गांधी यांनी देखील थेटपणे पंतप्रधान मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नराधमांना मृत्यूदंड

News Desk

शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही !

News Desk

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य,…तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया

News Desk