HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : आज घराघरात “अबकी बार चौकीदार चोर है”च्या घोषणा !

मुंबई । “अबकी बार चौकीदार चोर है” च्या घोषणा आज घराघरात दिल्या जात आहेत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. लोक आता पुलावरून जात नाहीत. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोपरी ब्रिजची हीच अवस्था. निवडणूक जिंकण्यासाठी नरबळी देण्याचे काम सरकार करत आहे की काय अशी शंका येतआहे, असा गंभीर आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

बावखलेश्वरला जे झाले तो व्यक्तिद्वेष होता. तुम्ही रावण आहात, बावखलेश्वर मंदिर पाडणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. नवी मुंबईत पार पडलेल्या बुथ कमिटीचा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यासह अनेक नेते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदीसाहेबाच्या आशिर्वादाने सोयाबीनचे दर पडले – शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

News Desk

मुंबईतील रस्त्याची परिस्थिती पाहून नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

News Desk

भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप; निवडणूक आयोगाला तक्रारीचा मेल

Aprna