HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : माध्यमांनाच माझ्या राजीनाम्याची जास्त घाई !

मुंबई | “मी अजून विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही. माध्यमांनाच माझ्या राजीनाम्याची जास्त घाई लागली आहे. पुढच्या दोन दिवसांत मी माझी भूमिका स्पष्ट करेन”, असे विधान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी (१३ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या निवड समितीकडे नगर लोकसभेसाठी डॉ. सुजय विखे यांच्या नावाची शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे विधान केले. “सुजयने भाजपमध्ये प्रवेश केला, आता तुम्हीही शिवसेनेत येऊन युती मजबूत करा”, अशी ऑफर देखील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली होती.

“मला वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागला. संकटकाळी ज्यांनी मला साथ दिली मी त्यांच्यासोबत राहणार असून मी अहमदनगरमध्ये पक्षाच्या वाढीसाठी काम करणार आहे”, असे भाजप प्रवेशादरम्यान सुजय यांनी म्हटले होते. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि त्यांचे कार्य आम्हाला सतत आठवते”, राऊतांची केंद्र-राज्य सरकारवर टीका

Aprna

ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव- वडेट्टीवार

News Desk

पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात !

News Desk