HW News Marathi
राजकारण

कदाचित मुख्यमंत्री माझ्या भाषणाला घाबरले असतील !

मुंबई | ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव आयोजकांनी सेहगल यांना पाठविलेले हे निमंत्रण तडकाफडकी रद्द केले. याबाबत नयनतारा सहगल यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. “मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात मी देशातील असहिष्णुता, हिंसाचारावर बोलणार होते. कदाचित मुख्यमंत्री माझ्या भाषणाला घाबरले असतील. म्हणूनच, मला देण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण रद्द करण्यात आले असेल”, असा टोला ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांनी लगावला आहे.

‘साहित्य संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात मी देशातील काही गंभीर समस्यांवर बोलणार होते. आयोजकांकडे माझे हे भाषण देखील पोहोचले होते. परंतु, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देखील हजर राहणार असल्याची मला कल्पना नव्हती. मुख्यमंत्र्यांना कदाचित माझे भाषण पसंत आले नसेल,’ असे सेहगल म्हणाल्या. देशातील सद्यपरिस्थिती आपल्या सर्वांनाच लाज वाटायला हवी, असे देखील सहगल यांनी म्हटले आहे. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्यात आल्याने विविध स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युती झाली तर आम्ही किरीट सोमय्यांसाठी प्रचार करणार नाही !

News Desk

‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माते यांच्यात आता ट्विटर वॉर

News Desk

२०१९ च्या लोकसभा निवणुकांमध्ये ‘हा’ असेल भाजपचा नवा नारा

News Desk