HW News Marathi
राजकारण

#MeToo : केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांचा अखेर राजीनामा

मुंबई | लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. अकबर नायजेरियात असताना भारतात #MeToo चे वादळ घोंघावले. नाना पाटेकर व तनुश्री दत्ता प्रकरणापासून सुरू झालेले हे प्रकरण काही क्षणात देशभरात पसरले आहे. एम. जे. अकबर पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे.

प्रिया रमाणी या पत्रकार महिलेने धाडस दाखवत एशियन एजचे संपादक असताना अकबर यांनी केलेल्या छळाचा पाढा ट्विटरवर वाचला आणि अनेक महिलांनी पुढे येत अकबर यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, अकबर विदेशातून परत आले आणि त्यांनी सगळे आरोप फेटाळत मानहानीचा दावा केला आहे. तब्बल २० महिलांनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपामुळे अकबर यांनी राजीनामा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी राज्यातील सर्वात मोठा घोटाळा केला उघड…

News Desk

#LokSabhaElections2019 : माध्यमांनाच माझ्या राजीनाम्याची जास्त घाई !

News Desk

‘मविआ’ सरकारला मोठा धक्का! उद्या बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna
राजकारण

#MeToo प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासाव्यात !  

News Desk

मुंबई | #MeToo प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासून पाहायला हव्यात असे मत युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ते डोंबवलीमध्ये नवरात्रोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

#MeToo आणि एसएनडीटीमधील विद्यार्थिनींनी महिला वॉर्डनवर केलेल्या आरोपांसंदर्भात त्यांना विचारले असता जिथे महिलांसोबत लैंगिक गैरवर्तनाचे प्रकार होतात, तिथे तातडीने कारवाई झालीच पाहिजे, असे अादित्य ठाकरे यांनी सांगितले. अशा प्राध्यापकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सोशल मीडिया तसेच प्रसिद्धी माध्यमाद्वारे अनेक महिला आवाज उठवत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या #MeToo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्री तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला आवाज उठवत आहेत. त्याच बरोबर अनेक वर्ष जुन्या घटना यामुळे सर्वांसमोर येत आहेत. तसेच या माध्यमातून अनेक प्रतिष्ठित लोकांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे .

Related posts

राहुल गांधीचे ‘डीएनए’ खराब, भाजप नेत्याची जीभ घसरली

News Desk

अंतर्गत चर्चा करून राऊतांनी वक्तव्य केले असेल!

Aprna

‘आप’ महाराष्ट्रात ठराविक जागांवर निवडणुका लढविणार !

News Desk