HW News Marathi
राजकारण

जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त, मनसेचे प्रत्युत्तर

मुंबई | “एक आणि एक दोन होतात की अकरा ? सध्या ह्याच गणितात झालाय राजकीय चौकीदारांचा बकरा. पूर्वी २ विचारी नेत्यांनी भाजपला घडवलं, आता २ विखारी माणसांनी भाजपला डूबवलं. विचारांची, विवेकाची हरवली शिस्त,आणि जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त”, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या खास शैलीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

दादरमधील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा प्रचार सुरु होता. यावेळी त्यांच्या प्रचारात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे काही कार्यकर्तेही सहभागी झाले होते. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ‘शिवाजी पार्कात एक शून्य दुस-या शून्याला भेटला’ असे म्हणत ट्विटच्या माध्यमातून मनसेवर निशाणा साधला होता. आता मनसेने आशिष शेलार यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते आशिष शेलार ?

‘शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शून्याला भेटला..गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला..पण उपयोग काय ? शून्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय, बाकी शून्यच !

नाही आले “एकनाथराव” भेटीला तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला?’, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे दिलेली आश्वासने पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही !

News Desk

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘रिट्रीट’मध्ये आमदारांची बैठक

News Desk

‘मातोश्री’नंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी संभाजी भिडे ‘वर्षा’वर

News Desk