HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारने देशाच्या हिताच्या दृष्टीने चांगले काम केले | शिवसेना

नवी दिल्ली | शिवसेनेच्या एका सदस्याने ६ व्या लोकसभेच्या अधिवेशनात मोदी सरकारचे कौतुक केले आहे. “गेल्या पाच वर्षांमध्ये मोदी सरकारने देशाच्या हिताच्या दृष्टीने चांगले काम केले, हे विरोधकांनी देखील मान्य करायला हवे. अपेक्षा आहे कि देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येईल”, असे म्हणत शिवसेना सदस्य आनंदराव अडसूळ यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमने उधळली.

“मोदींनी परदेशात देशाची प्रतिमा चांगली बनविली, याचा आम्हाला गर्व आहे”, असेही ते यावेळी म्हणाले. सत्ताधारी एनडीएमध्ये सामील पक्षातील एका सदस्याने असे म्हटले कि, “जे जे काही आम्हाला करता आले ते आम्ही चांगल्या मनाने केले आहे. निवडणूक येतील आणि जातील, हार-जीत होत राहील, परंतु अशी अपेक्षा आहे कि पुन्हा एकदा देशात बहुमताने एनडीएचे सरकार यावे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी २३ मे रोजी गुलाल उधळायला बारामतीत जाणार !

News Desk

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक, ‘या’ नेत्यांचा उपस्थित राहण्यास नकार

News Desk