HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारला लष्कराच्या इतिहासाबाबत माहिती नाही !

नवी दिल्ली | “मोदी सरकारला लष्कराच्या इतिहासाबाबत माहिती नाही. ज्याला माहिती आहे ते जाणतातच कि यापूर्वीही बऱ्याचदा सर्जिकल स्ट्राइक झालेले आहेत. मी १९६४ ते १९६७ या काळात वेस्टर्न कमांडवर होतो. या काळात जवळपास १०० स्ट्राईक झाले. केवळ आम्ही त्यांना सर्जिकल स्ट्राईक नव्हे तर क्रॉस बॉर्डर रेड म्हणायचो”, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमरिंदर सिंग बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

“पंतप्रधान मोदी हे लष्कराच्या संपूर्ण कारवाईचे श्रेय स्वतःला घेतात. एकतर पंतप्रधान मोदींकडे ज्ञानाचा अभाव आहे किंवा ते मुद्दाम बोलत आहेत”, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. “१९४७ साली पंतप्रधान कोण होतं ? १९६२ साली पंतप्रधान कोण होतं ? १९६५, १९७२ साली पंतप्रधान कोण होते ? आम्ही पाकिस्तानचे तुकडे केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे केले. परंतु, त्यांनी कधीही असे म्हटले नाही की, ‘हे’ मी केले. त्यांनी याचे श्रेय इतरांनाच दिले. परंतु, ही व्यक्ती सारखी म्हणते कि, हे मी केले. तुम्ही कोण आहात ? ही तुमची नाही भारताची सेना आहे”, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ पाहुण्यांना आहे निमंत्रण

News Desk

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

News Desk

रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते!

swarit