HW News Marathi
राजकारण

गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने मुस्लिम विरोधीच काम केले | ओवेसी

मुंबई | मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर आज (२३ फेब्रुवारी) बहुजन वंचित आघाडीची महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जनतेला संबोधिले. यावेळी ओवेसींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत मुस्लिमांविरोधात जेवढे काम करता येईल तेवढे केले. या सरकारची भूमिका मुस्लिमविरोधी आहे,” असा घणाघात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. “पंतप्रधान मोदी तुम्ही जेथे ‘भारत व्याप्त काश्मीर’ असे म्हटले जाते तिथे जाऊन का बसता ?” , असा सवालही ओवैसी यांनी यावेळी केला आहे.

“पुलवामामध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तान सरकार, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय सरकार जबाबदार आहे. पाकिस्तानने आपला निरागसतेचा बुरखा फाडावा. इम्रान खानवर आपण विश्वास ठेऊ शकत नाही. मसूद अझर मौलाना नाही तर सैतान आहे”, अशी जोरदार टीका ओवेसी यांनी पाकिस्तानवर केली आहे. “पुलवामामध्ये २०० किलो आरडीएक्स कुठून आले ? गुप्तचर विभाग बिर्याणी खाऊन झोपले होते काय ?”, असा सवाल यावेळी ओवेसी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

“जेव्हा जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा तेव्हा सर्व भारतीय एकत्र होतात. भारतात विविधतेत एकता आहे”, असेही ओवैसी यांनी यावेळी म्हटले आहे. ओवेसी यांनी यावेळी भाजपसह काँग्रेसवर देखील सडकून टीका केली आहे. “मुस्लिमांनी काँग्रेसला साथ दिली नाही. काँग्रेसमुळे मुस्लिमांना त्रास सहन करावा लागला आहे. काँग्रेस, भाजपला धडा शिकविण्याची ही शेवटची संधी”, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

“आमची आघाडी नैसर्गिकरित्या झालेली आहे. अबकी बार ना मोदी, ना राहुल, अबकी बार सिर्फ प्रकाश आंबेडकर. तुम्ही फक्त अल्लाहला घाबरता तर तुम्हाला मोदी, राहुल, पवार, ठाकरेंशी घाबरायची गरज नाही”, असेही ओवेसी यांनी यावेळी म्हटले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

बिल्डर उमेदवाराला मत देऊ नका. निवेदन द्यायला आम्ही कुणाकडे जाणार नाही. कॉंग्रेससोबत आमची लढाई तत्वावरुन आहे. आम्ही कॉंग्रेससाठी शेवटपर्यंत थांबू आमचे दरवाजे कॉंग्रेससाठी कायम उघडे ठेवू असं म्हणत महा आघाडीत सामील होण्यास अजूनही तयार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दीला. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या दोन आघाड्यांना पर्याय देण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमसोबत ‘वंचित बहुजन आघाडी’ ची स्थापना केली आहे. या आघाडीची मुंबईतली पहिली सभा आज सायंकाळी दादर, शिवाजी पार्क येथे पार प़डली. यावेळी ते बोलत होते. तुम्ही ७० वर्ष कॉंग्रेसला मतं दीलं. आता वंचित आघाडीचा साथ द्या म्हणत त्यांनी मतदारानां साद घातली.

 

https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/661881600917729/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांनी केला वायूदलाला सलाम

News Desk

लाचारी माझ्या रक्तात नाही, माझ्या वडिलांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला !

News Desk

#LokSabhaElections2019 : उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

News Desk