HW News Marathi
राजकारण

मोदींनी ‘आयएनएस विराट’प्रकरणी राजीव गांधींवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे !

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आयएनएस विराट या युद्धनौकेप्रकरणी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा माजी नौदल प्रमुख एल.रामदास यांनी केला आहे. “राजीव गांधी हे ‘आयएनएस विराट’वर आपल्या सासरच्या मंडळींसह सुट्टीत फिरण्यासाठी गेले होते”, असा आरोप पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दिल्लीतील प्रचारसभेत केला होता. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा हा आरोप खोटा असल्याचे एल.रामदास यांनी म्हटले आहे. “ज्यावेळचा संदर्भ पंतप्रधान मोदी देत आहेत. त्यावेळी राजीव गांधी आयएनएस विराटवर होते. मात्र, त्यामागचे कारण वेगळे होते”, असे एल. रामदास यांनी म्हटले आहे.

“पंतप्रधान मोदींचे हे विधान पूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहे. त्रिवेंद्रम येथून लक्षद्विपला जाणाऱ्या ‘आयएनएस विराट’वर राजीव गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित होत्या. मात्र, ते त्रिवेंद्रममध्ये राष्ट्रीय खेळांच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते आणि ते लक्षद्वीप येथे एका कार्यालयीन कामासाठी जात होते. तेथे त्यांना ‘आयलंड डेव्हलपमेंट अथॉरिटी’च्या बैठकीत उपस्थित राहायचे होते”असे एल रामदास यांनी म्हटले होते.

“राजीव गांधी हे सुट्ट्यांसाठी आपल्या सासरच्या लोकांना ‘आयएनएस विराट’वर घेऊन गेले होते”, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला होता. मात्र, एडमिरल रामदास यांच्या माहितीनुसार, त्यावेळी या युद्धनौकेवर कोणतीही विदेशी व्यक्ती उपस्थित नव्हती. एडमिरल रामदास यांच्यासह आणखी ४ माजी नौदल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी एक प्रेस रिलीज जारी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण ?, अखेर आज होणार निश्चित

News Desk

मी जिथे आहे तिथे खूश आहे !

News Desk

गडकरी, आंबेडकर, चव्हाणांसह दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

News Desk