HW News Marathi
राजकारण

‘शिर्डीमध्ये मोदींनी केला शेतक-यांचा इव्हेंट’

मुंबई | शिर्डीच्या साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी साईबाबा संस्थान शिर्डी येथे आगमन झाले होते. मोदी साई समाधी शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी आलेल्या मोदींच्या हस्ते विविध कामांचे भूमीपूजनदेखील करण्यात आहे. पंतप्रधान आवास योजनेतील काही लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते घरकुलांच्या चाव्या देखील देण्यात आल्या. या कार्यक्रमात मोदी जनतेशी संवाद साधून महाराष्ट्राला भेडसावत असलेल्या समस्यांविषयी संवाद साधतील अशी जनतेची अपेक्षा होती.

परंतु यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणून न बोलता केवळ आपली घरकुल योजना कशी वाटली याविषयी मोदींनी जनतेची मते जाणून घेतली. हा कार्यक्रम नियोजित इव्हेंट असल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. सातारा, लातूर, नागपूर या ठिकाणी रहाणा-या अनेक नागरिकांशी बोलताना केवळ १ आणि २ मिनीट इतका कमी वेळ त्यांना मत मांडणीसाठी देण्यात आल्यामुळे अनेकजणांनी योजनेशी संलग्न मोजकेच भाष्य केले. महाराष्ट्रातील दुष्काळ पाहता मोदी दुष्काळ, शेतकरी, खते, बी-बियाणे, शेतीसह, शैक्षणिक बाबींवर विषेश भाष्य करतील अशी जनतेची अपेक्षा होती. परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर टिका करत महत्वाच्या विषयांना बगल देत देत मोदींनी सत्ता आल्यानंतर आपण केलेल्या कामाचा पाढा वाचला.

मोदींनी महाराष्ट्रातील दुष्काळ या विषयावर कर्नाटक सरकारप्रमाणे शेतकरी आणि जनतेचा विचार करणे गरजेचे होते ते या ठिकाणी पहायला मिळाले नाही. आयुष्यमान भारत, उज्वला योजनांविषयी माहिती देऊन २०१९ला पुन्हा एकदा भाजप सरकारला महाराष्ट्रात संधी द्या असे सूचक आवाहन मोदींनी वारंवार केल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामुळे या कार्यक्रमाला राजकीय दृष्ट्या विषेश महत्व प्राप्त झाले होते.

दुष्काळ ही महाराष्ट्रातील प्रचंड गंभीर अशी समस्या आहे. त्यातचं यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे यंदा दुष्काळाची झळ मोठ्याप्रमाणात जनतेला सोसावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेशी याविषयी भाष्य करणे आवश्यक होते. परंतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदींनी हा जनतेसाठी नव्हे तर पक्षासाठी इव्हेंट केल्याचे पहायला मिळाले. यावेळी मोदींनी स्वःता अनेक प्रश्न विचारले जे केवळ त्यांच्या योजनांशी निगडीत होते. यातून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आपण जनतेसाठी आणलेल्या योजनांचा पाढा वाचून दाखवला.

सत्तेत असलेल्या सरकारने जनतेसाठी काम करणे हे बंधनकारक असते हे सोइस्करपणे विसरुन मोदींनी भाजपाने केलेल्या कामाची जाहिरात या कार्यक्रमात केली. व्हिडीओ कॉंन्फरन्स द्वारे संवाद साधताना अनेकदा योजनांबाबत प्रश्न विचारत योजना पोहचल्या आहेत कि नाही आणि कोणकोणत्या योजना सरकारने आणल्या या बाबत जनतेला माहिती दिली.

परंतु यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येविषयी मोदींनी बोलणे टाळल्यामुळे मोदींना खरेच शेतकरी आत्महत्येविषयी आत्मीयता आणि जनतेचा कळवा आहे का ? की केवळ आगामी निडणुकीत मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मोदी महाराष्ट्रात आले आणि एक नियोजित इव्हेंट करुन निघून गेले हा प्रश्न सध्या जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साध्वी प्रज्ञा यांनी केला पक्षाची शिस्त पाळण्याचा संकल्प

News Desk

राजकीय नेत्यांचे निवृत्तीचे वय ठरलेले नसते, सुमित्रा महाजन यांचा नाराजीचा सूर

News Desk

श्री रामाला साकारणार शिल्पकार राम सुतार

News Desk