HW News Marathi
राजकारण

खंडाळ्याच्या शेतकऱ्यांचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

मुंबई | भूअधिग्रहनादरम्यान आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप खंडाळ्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत होता. या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आज (२१ जानेवारी) मंत्रालयात दाखल झाले होते. चर्चेतून काही तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा, या शेतकऱ्यांकडून देण्यात आला. दरम्यान, या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अर्धनग्न अवस्थेत आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी माझे आणि सरकारचे आभार मानले, अशी माहिती देसाई यांनी दिली आहे.

अधिग्रहन टप्पा ३ मधील पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या परवानगीने घेण्यात येतील. त्याचप्रमाणे हरकती असलेल्या जमीनी अधिग्रहित करण्यात येणार नाहीत, असे आश्वासन देसाई यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, आपल्या मागण्या मान्य न झाल्यास जल समाधी घेण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार

Gauri Tilekar

काँग्रेसनंतर आता ‘नमो अ‍ॅप’शी संबंधित १५ पेजेसवर देखील कारवाई

News Desk

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज थंडावणार

News Desk