HW News Marathi
राजकारण

खासदार पाटील भाजपावर नाराज ?

सांगली | भाजपचे खासदार तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील यांचे मागील काही महिन्यांपासून भाजपसोबत पटत नसल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपातील नेत्यांना बगल देवून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड आणि कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ. सदाशिव पाटील या दोन पक्षाबाहेरील नेत्यांशी त्यांची जवळीक वाढविली आहे. मिरज, जतमध्येही पक्षातील आ. संजयकाका गटाविरोधात असल्याचे दिसते. आगामी निवडणुकीसाठी पक्षातील नेत्यांवर विसंबून न राहता अन्य पक्षातील नेत्यांशी सोयरीक जमविणे सुरु आहे, त्यामुळे संजयकाकांचा भाजपवर भरोसा नाही..? अशी चर्चाही सुरु आहे.

दुसरीकडे खानापूर-आटपाडीचे माजी आ. सदाशिव पाटील यांच्याशीही खा. पाटील यांची जवळीकता वाढली आहे. सदाशिव पाटील हे प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, ते पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. त्यांनी अनेकवेळा ती नाराजी बोलूनही दाखविली आहे. त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विटा शहरात आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना खासदारांनी हजेरी लावली. पलूस-कडेगाव आणि खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेत्यांना सोडून संजयकाकांनी विरोधी पक्षातील नेत्यांसोबत मैत्री घट्ट करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसत आहे.

भाजप नेत्यांतील वादांमुळे पक्षातील नेते आगामी लोकसभा निवडणुकीत मदत करणार का? असा प्रश्‍न खा. पाटील यांना भेडसावतोय. त्याच कारणांमुळे पक्षातील नेत्यांना बगल देत खासदारांनी अन्य पक्षांतील नेत्यांशी जवळीक साधायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनास त्यांनी उपस्थिती दर्शविली. लाड हे राष्ट्रवादीचे प्रदेश नेते आहेत, त्यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलावण्याची गरज होती , मात्र स्वपक्षातील नेत्यांपेक्षा खा. संजयकाका पाटील यांना निमंत्रण दिले. तसे संजयकाकांनी कारखान्यातील काही प्रश्‍नांसाठी लाड यांना मदत केलीच आहे, हे विसरुन चालणार नाही. नोव्हेंबर महिन्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत ते मोठा कार्यक्रम घेणार आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर जी.डी. बापू लाड यांचा पुरोगामी विचारांचा वारसा बाजुला ठेवून अरुणअण्णा लाड यांची भाजपशी वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरला आहे.

संजय पाटील यांचे व भाजपचे पूर्वाश्रमीचे स्टार प्रचारक धनगर समाजाचे नेते गोपीचंद पड़ळकर यांचे बिनसले आहे,तर पड़ळकर यांनी आरेवाडी येथे गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना आणून थेट भाजपावरच तोफा डागल्या गेल्या.धनगर समाज एकत्र झाल्यामुळे धनगर समाजाची मत संजयकाका यांना मिळतील की नाही तो येणारा काळच ठरवणार आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनवहिनी पाटील यांनाही दोन तीन कार्यक्रमात बोलवले होते, तर कॉग्रेसचे तरुण नवखे इच्छुक उमेदवार सांगली कारखान्याचे चेअरमन व स्व वसंतदादा यांचे नातू विशाल पाटील यांनी वसंतदादा महोत्सव कार्यक्रमातूनच निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…आम्ही कधी ‘या’ गद्दारांना धडा शिकवतो”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Aprna

संसदेच्या अधिवेशनात मोदींची अग्निपरीक्षा

News Desk

“मी फिक्स मॅच पाहात नाही”, देवेंद्र फडणवीसंचा उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टोला

Chetan Kirdat