HW News Marathi
राजकारण

पाकिस्तान सीमेवर वाढत आहे मुस्लिम लोकसंख्या !

जयपूर | राजस्थान येथील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमारेषेच्या भागात मुस्लिमांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सीमा सुरक्षा दलाने यासंदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने काळजी व्यक्त केली आहे.

राजस्थाच्या या भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या २२ ते २५ टक्क्यांनी वाढली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतर समाजाची लोकसंख्या वाढ फक्त ८ ते १० टक्क्यांनी झाली आहे. त्यामुळे सिमा सुरक्षा दलाने गृहमंत्रालयाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सदर ठिकाणी मुस्लीम लोकसंख्या वाढली असली तरी येथील हिंदू-मुस्लीम समाजात तेढ नाही. दोन्ही समाज एकोप्याने राहतात, असे ही बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सिमा सुरक्षा दलाने जैसलमेरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर सर्वेक्षण केले होते. त्यातून ही माहिती समोर आली आहे. भारत पाकचे तणावपुर्ण संबंध पाहता मुस्लिम जनसंख्या वाढत असताना भारताने विषेश काळजी घेणे गरजेचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : मोदी साहेब, २०१४ सालच्या ट्रिक्स आता कामी येणार नाहीत !

News Desk

विधानसभा अध्यक्षांनी ऋतुजा रमेश लटकेंना दिली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Aprna

प्रसारमाध्यमांमुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी | विनोद तावडे

News Desk
मुंबई

पावसाळापूर्व कामांची पाहणी करण्याचे आयुक्तांचे आदेश

swarit

मुंबई | पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये यासाठी सध्या मोठय़ा प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येने रस्त्यांची आणि चर खोदणे व भरण्याची कामे सुरू असून कामे पूर्ण झाल्यानंतर तेथे बांधकामविषयक साहित्य पडून राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा साचून राहू नये यासाठी रविवारी (३ जून) पालिका उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांनी जातीने पाहणी करावी, असे आदेश देत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या अधिकाऱ्यांची रविवारची रजा रद्द केली. अधिकाऱ्यांनी रविवारी रस्त्यांची पाहणी केल्याचा पुरावा म्हणून आपली छायाचित्रे अतिरिक्त आयुक्तांना पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पावसाळ्यात मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश अजोय मेहता यांनी शनिवारी पालिका उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना पालिका मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, विजय सिंघल, आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह पालिका उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि विभागप्रमुख उपस्थित होते. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्ते, पदपथांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी चर खोदण्याची व ते भरण्याची कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी कामे झाली आहेत अशा ठिकाणी खडी, डांबर, बॅरिकेड्स पडून राहतात आणि त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे कामे पूर्ण झाल्यानंतर कार्यस्थळावरून बांधकामविषयक साहित्य तात्काळ हटविण्याचे आदेश यापूर्वीच अजोय मेहता यांनी दिले होते. मात्र बांधकामविषयक साहित्य टाकून कंत्राटदार पळ काढत असल्याचे आयुक्तांच्याच निदर्शनास आले होते. त्यामुळे मासिक आढावा बैठकीमध्ये अजोय मेहता यांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतली. परिमंडळीय उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांनी ३ जून रोजी रविवारची सुट्टी न घेता आपल्या विभाग कार्यालयाच्या हद्दीतील रस्ते, पदपथ आणि चर यांची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी. तेथे बांधकामविषयक साहित्य पडलेले निदर्शनास आल्यास ते तात्काळ योग्य ठिकाणी हलवावे. ही कामे येत्या सोमवापर्यंत पूर्ण करावी, असे आदेश अजोय मेहता यांनी दिले.

Related posts

बांद्रामधील अनधिकृत झोपडपट्टी वासियांचे माहुलमध्ये होणार स्थलांतर

News Desk

पर्यावरणपूरक उपक्रमाने प्लास्टिक बंदीचे स्वागत

News Desk

रिक्षात झोपलेल्या सख्या बहिणीवर बलात्कार

News Desk