HW News Marathi
राजकारण

कितीही चौकशी केल्या, तरी माझे तोंड बंद होणार नाही !

मुंबई । “मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या, अशा कितीही चौकशी केल्या तरी माझे तोंड बंद होणार नाही.” तब्बल साडेआठ तासांच्या ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे. कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना काल (२३ ऑगस्ट) सकाळी चौकशीसाठी बनविण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज यांची साडेआठ तासांहून अधिक वेळ चौकशी केली. ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर प्रसार माध्यमांनी राज यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज यांनी माध्यमांशी बोलणे टाळत कुटुंबियांसोबत थेट कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नते, कार्यकर्ते आणि राज यांच्या चाहत्यांनी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती. कृष्णकुंजबाहेरही माध्यमांनी राज यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु राज काही बोलले नाहीत. परंतु चाहत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना राज यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, “सरकारने या प्रकरणाच्या माझ्या पाठी कितीही चौकशा लावल्या, तरी मी शांत बसणार नाही, आणि मी योग्य वेळी तुमच्याशी बोलेन.” दरम्यान या प्रकरणातील राज ठाकरे यांची चौकशी पूर्ण झाली असून, गरज पडली तरच राज यांना चौकशीसाठी बोलावले जाईल,” अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे?

News Desk

‘भीम आर्मी’च्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देण्यास पोलिसांचा नकार

News Desk

२०१९ च्या लोकसभा निवणुकांमध्ये ‘हा’ असेल भाजपचा नवा नारा

News Desk