HW News Marathi
राजकारण

एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ प्रस्ताव पास

नवी दिल्ली | लोकसभेचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२१ मे) पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत एनडीएच्या नेत्यांची बैठक आणि डिनर पार्टी झाली. यावेळी एनडीएच्या बैठकीत उपस्थित असलेल्या ३६ पक्षांकडून पंतप्रधान मोदींच्या उत्कृष्ठ नेतृत्त्वावर प्रस्ताव पास करण्यात आला. या प्रस्तावात, एनडीएकडून पंतप्रधान मोदींचे आभार मानत पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात एनडीए आणखी मजबूत झाल्याचे देखील म्हणण्यात आले आहे.

एनडीएच्या बैठकीत एक प्रस्ताव संमत करण्यात आला. या प्रस्तावात असे म्हटले गेले आहे कि, एनडीए खऱ्या अर्थाने भारताच्या विविधतेचे आणि गतिमानतेचे प्रतिनिधित्व करते. हे भारताच्या १३० कोटी जनतेच्या स्वप्नांचे आणि आकांक्षांचे गठबंधन आहे आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारमध्ये हे स्पष्टपणे दिसते. “आज एनडीए भारताच्या राजकारणाचा प्रमुख स्तंभ बनला आहे”, असेही या प्रस्तावात म्हणण्यात आले आहे. सरकारच्या लोककल्याण योजनांनी लोकांना सशक्त बनविल्याचा दावा देखील या प्रस्तावात करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदी स्वतंत्र भारताला मिळालेले सर्वात वाईट पंतप्रधान”

News Desk

“…मग हे संकट काहीच नाही,” उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला टोला

Aprna

संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही !

News Desk