HW News Marathi
राजकारण

केवळ काल्पनिक धाडस दाखवून देशाची प्रगती साधता येत नाही !

नवी दिल्ली | “देशाला एका अशा नेत्याची गरज आहे जो लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करू शकेल. लोकांच्या समस्या सोडवू शकेल. केवळ काल्पनिक धाडस दाखवून देशाची प्रगती साधता येत नाही”, असे म्हणत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. नवी दिल्लीतील कार्पोरेट एआयएमए मॅनेजिंग अवॉर्ड सोहळ्यात प्रणव मुखर्जी बोलत होते. यावेळी मुखर्जी यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

देशातील १ टक्के जनतेकडे देशातील ६० टक्के पैसा असणे हे अत्यंत चिंताजनक आहे. आयएमएफच्या आकडेवारी पाहता भारताची अर्थव्यवस्था ही सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे म्हटले जात आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था ही युएसडी २.६९ ट्रिलियन एवढी आहे. मार्च २०१९ चा भारताचा विकासदर ७.४ आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात विकासदर (जीडीपी) ७.६ टक्क्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचेही प्रणव मुखर्जी यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेठीत भाजपच्या स्मृती इराणींची आघाडी, काँग्रेसच्या वर्चस्वाला धोका ?

News Desk

मुख्यमंत्र्यांनी पवारांना भेटीसाठी वेळ दिली नाही ?

News Desk

#MeToo : केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांचा अखेर राजीनामा

News Desk