HW News Marathi
राजकारण

आता विधानसभा लढवा…अन् त्यानंतरच राजकारणातून संन्यास घ्या !

नवी दिल्ली | “नागपूरमधून गडकरी जिंकले तर मी राजकारणातून संन्यास घेईन”, असे वक्तव्य नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नागपूर मतदारसंघातून विजयी झालेले भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांना खोचक टोला लगावला आहे. “आता विधानसभा लढवा…अन् त्यानंतरच राजकारणातून संन्यास घ्या”, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नागपूरमधून नितीन गडकरी हे तब्बल दोन लाखांहूनही अधिक मतांनी निवडून आले आहेत.

नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नागपूरमधून नितीन गडकरी यांचा पराभव करण्याचा दावा केला आहे. नागपूरमधून ५ लाखांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा नाना पटोले यांनी केला होता. जर मी जिंकलो नाही तर मी राजकारण सोडून देईन, असे पटोले यांनी म्हटले होते. दरम्यान, प्रत्यक्षात गडकरी यांना ६ लाख ४६ हजार ०७५ तर पटोले यांना ४ लाख ३६ हजार ६५८ मते मिळाली आहेत. गडकरी यांनी पटोलेंचा तब्बल २ लाख १६ हजार मतांनी पराभव केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचा जाहीरनामा, सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत चर्चा करणार !

News Desk

रामदास कदम उद्धव ठाकरेंचा कुत्रा, नितेश राणेंची जहरी टीका

News Desk

गेल्या ५ वर्षात सुप्रिया सुळेंसह शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत वाढ

News Desk