HW News Marathi
राजकारण

आता हैदराबादचेही नाव बदलणार ?

हैदराबाद | सध्या देशातील विविध राज्यांची नावे बदलण्याचा सपाटाच सर्वच राजकीय नेत्यांनी लावला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी अलाहबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ केले. आता पुन्हा हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ असे ठेवणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. तेलंगणात भाजप सत्तेत आल्यास आम्ही हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. रविवारी (२ डिसेंबर) हैदराबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते.

“देशात कोणत्याही ठिकाणी दहशतवादी घटना घडल्या कि त्यांचे कनेक्शन हैदराबादमध्ये सापडते. हैदराबादमधील काही संघटनांचे दहशवाद्यांशी संबंध आहेत. त्यांना नष्ट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. दरम्यान, अन्य २५ शहरांची नावे बदलण्याचा प्रस्ताव भाजपच्या विचारधीन असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हैदराबादमध्ये दहशतवादी कारवायांना वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गौतम गंभीर पुन्हा अडचणीत, परवानगीशिवायच घेतली प्रचारसभा

News Desk

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार! – उद्धव ठाकरे

Aprna

रिपब्लिकन कार्यकर्त्यांसाठी सत्तेतील वाटा  मिळवून देणारच | आठवले

News Desk
देश / विदेश

राधे माँ यांचे जुन्या आखाड्यात पुनरागमन !

News Desk

प्रयागराज | नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ यांचे जुन्या आखाड्याने निलंबन रद्द केले असून त्यांना महामंडलेश्वरची पदवी परत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रयागराजमधील कुंभमेळ्याआधी जुन्या आखाड्यात राधे माँ यांचे पुनरागमन झाले आहे. भक्तांच्या कडेवर बसून अश्लील नृत्य केल्याप्रकरणी राधे माँने लेखी माफी मागितली असून भविष्यात असे कृत्य पुन्हा करणार नाही, अशी हमी त्यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांना जुन्या आखाड्यात पुन्हा प्रवेश मिळाला आहे.

येत्या २५ तारखेला प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात महामंडलेश्वर म्हणून राधे माँला जमीन आणि इतर सुविधाही देण्याचा निर्णय जुना आखाडाने घेतला आहे. गेल्याच वर्षी आखाडा परिषदेने त्यांचे नाव बोगस बाबांच्या यादीत टाकले होते. त्यामुळे जुन्या आखाड्याचा हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे बोलले जात आहे. राधे माँचे निलंबन रद्द आणि पदवी परत करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जुन्या आखाड्याच्या बैठकीत घेतला होता. त्याची औपचारिक घोषणा रविवारी प्रयागराजमध्ये आखाड्याचे संरक्षक महंत हरिगिरी यांनी केली. ‘राधे माँविरोधात अनेक पथकांनी तपास केला. पण कुणीही तिच्याविरोधात गंभीर आरोप केले नाहीत. आता तिच्याविरोधात कोणताही फौजदारी खटलाही नाही,’ असेही हरिगिरी यांनी सांगितले.

Related posts

‘वंदे भारत एक्‍स्प्रेस’ १५ फेब्रुवारीला धावणार

News Desk

अनेक पातळीवरून केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

News Desk

गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवारांच्या भेटीला दिल्लीत,राजकीय घडामोडींना वेग!

News Desk