HW News Marathi
राजकारण

सत्ता नको, मला विरोधी पक्ष व्हायचंय !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर, पुण्यात बुधवारी (९ ऑक्टोबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे पुण्यातील जाहीर सभा रद्द झाली. त्यानंतर, गुरुवारी (१० ऑक्टोबर) मुंबईत सांताक्रूझमध्ये राज ठाकरे यांनी आपली पहिली जाहीर घेतली. “मला सत्ता नको. सत्ता माझ्या आवाक्यात असेल तेव्हा सत्तेची मागणी करेन. मात्र,आता मला विरोधी पक्ष व्हायचंय”, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरे यांच्या प्रचारसभेत महत्त्वाचे मुद्दे :

  • मला विरोधी पक्ष व्हायचंय
  • सत्ता माझ्या आवाक्यात असेल तेव्हा सत्तेची मागणी करेन. मात्र, आता मला विरोधी पक्ष व्हायचंय.
  • आता सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे.
  • जाणिवा मेल्या आहेत कि काय तुमच्या ? कधी प्रश्न विचारणार ? आश्वासने का पूर्ण झाली नाही म्हणून प्रश्न का नाही विचारात ?
  • न्यायालयाकडून पण न्याय मिळेल का ? शंका आहे
  • तरुणांच्या रोजगाराच्या आश्वासनांचे काय झाले ?
  • मी तुमच्यासमोर एक मागणी करायला आलो आहे,”या राज्याला सर्वार्थाने आज ज्याची गरज आहे. सक्षम, प्रबळ, कोणाकडेही घरंगळत न जाणाऱ्या विरोधी पक्षाची गरज आहे. सत्तेतील आमदार जाब विचारू शकत नाही, विरोधातला आमदार तो जाब विचारू शकतो.
  • कालची पुण्याची सभा वादळी पाऊसामुळे रद्द करावी लागली. त्यात काल पीएमटी बस चालक बसवर झाड पडून मृत्युमुखी पडला. बघा काय अवस्था आहे आपली. घराबाहेर पडल्यावर काय होईल माहित नाही. पुण्यासारख्या शहराची ही अवस्था. अर्ध्या तासाच्या पावसाने शहराचा पार विचका झाला. तर इथे ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. काय दुर्दैवी घटना आहे ही.
  • पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण? तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतं, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?
  • आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत.. बेरोजगारी टोकाला आहे, उद्योग बंद पडत आहेत. काय झालंय लोकांना? त्यांच्या जाणिवांना? बाबासाहेब पुरंदरे एक वाक्य नेहमी म्हणतात,’जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेतं’. ह्या सगळ्या घटना बघितलं की वाटतं, आपल्या जाणिवा शून्य झाल्यात आपण फक्त प्रेतं झालो आहोत? आणि जर विरोधी पक्षातले नेते सरकारसमोर घरंगळत जाणार असतील आणि जनता सुद्धा सरकारला जाब विचारणार नसेल तर ह्या सरकारला प्रश्न विचारणार तरी कोण आहे?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत

News Desk

कॉंग्रेसने कधीही भगवा दहशतवाद असे म्हटले नाही | पीएल पुनिया

News Desk

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘आफ्स्पा’बाबतच्या आश्वासनावर अमित शहांची सडकून टीका

News Desk