HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात २ ऑक्टोबरला राज्यभर मौनव्रत धारण करत आंदोलन…

मुंबई | केंद्र व राज्यसरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक,सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन करत आहे.

भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारच्याविरोधात राष्ट्रवादीने आंदोलनाचे हत्यार उपसले असून २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर महात्मा गांधीजींच्या पुतळयाखाली बसून धरणे व मौनव्रत आंदोलन केले जाणार आहे.

राज्यासह मुंबईमध्ये मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदी नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत महात्मा गांधींजींच्या पुतळयासमोर धरणे व मौनव्रत धारण करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील यांनी दाखल केले ४ उमेदवारी अर्ज

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचे काम शशांक राव यांनी केले !

News Desk

टिपू सुलतानच्या जयंतीला कर्नाटकात विरोध, २ शहरात जमाव बंदी

News Desk
मुंबई

ओला-उबर १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर

News Desk

मुंबई | गेल्या १५ दिवसांपूर्वीच ओला उबर टॅक्सीचालकांनी तब्बल १२ दिवस संप पुकारला होता. ज्यामध्ये मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रातील ओला उबर टॅक्सीचालक सहभागी झाले होते. त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा होऊनही कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने टॅक्सीचालक-मालकांनी येत्या १७ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा संपाची घोषणा केली आहे.

‘सरकारी पातळीवरील चर्चा होउनही आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने, तसेच दोन ते तीन वेळा मीटींग घेऊन आश्वासन देउनही ओला, उबर कंपन्यांकडून कुठलेही आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यामुळे आमच्यावर पुन्हा संप करण्याची वेळ आली आहे. यामध्ये १७ नोव्हेंबरपासून संप पुकारण्यात येईल तर १९ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत, असे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात हा संप पुकारण्यार येणार आहे. तब्बल ६० हजार गाड्यांचे चालक मालक या संपात सहभागी होतील. ‘कॅब चालकांना चांगला परतावा मिळावा, ऑनलाईन कॅबचं किमान भाडं १०० ते १५० रुपये असावं, प्रति किलोमीटर १८ ते २३ रुपये भाडं लावावं’, अशा मागण्या ओला-उबर चालकांनी केल्या आहेत.

Related posts

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

News Desk

विमानातून साडेचार कोटीचे सोने जप्त

News Desk

श्वान पथकच्या मदतीने वडाळा रेल्वे स्थानकाची तपासणी, रेल्वे पोलिसांना सतर्कतेचा इशारा

News Desk