HW News Marathi
राजकारण

पवारांनी मराठ्यांना केले शांततेचे आवाहन

बारामती | गेल्या काही दिवसात राज्यात मराठा आरक्षणाचे राजकारण पेटल्याचे पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन सध्या राज्यात सुरु असलेले आंदोलन शांत होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळायला हवेत, औद्योगिक क्षेत्राला आंदोलनाची झळ पोहोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असेही पत्रकात पवारांनी मराठा आंदोलकांना सांगितले आहे. दरम्यान, राज्यकर्ते व हितसंबंध घटक मराठा आंदोलन बदनाम करण्याचे काम करत आहेत, असेही ते या पत्रकात म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अडचणीत आल्या किरण खेर आयोगाने पाठविले नोटीस

News Desk

“शिवसेना बंडखोरांनी नव्हे, तर भाजपने फोडली,” उद्धव ठाकरेंचा आरोप

Aprna

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने भोसरी MIDC मधील धक्कादायक प्रकार आणला उघडकीस

News Desk