HW News Marathi
राजकारण

वायनाडच्या लोकांनी एकदा अमेठीत येऊन पाहावे अन् सावध व्हावे !

नवी दिल्ली | “वायनाडच्या लोकांनी एकदा अमेठीत येऊन पाहावे आणि सावध व्हावे, असे मी त्यांना आवाहन करते. गेल्या १५ वर्षांपासून अमेठीच्या खासदारपदी अशी एक व्यक्ती आहे, जी या ठिकाणी येत देखील नाही. आता ते दुसऱ्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. हा अमेठीच्या लोकांचा अपमान आहे”, असे भाजपच्या अमेठीतील उमेदवार स्मृती ईराणी यांनी म्हटले आहे. राहुल यांनी गुरुवारी (४ मार्च) वायनाड मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अमेठीतील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली.

लखनऊ विमानतळावर पत्रकाराकांशी बोलताना स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी अमेठीतूनच निवडणूक लढविली होती. त्यावेळी देखील त्यांचा सामना स्मृती ईराणी यांच्याशीच झाला होता. त्यावेळी स्मृती ईराणी तब्बल ३ लाख मते मिळवत राहुल गांधींचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा राहुल गांधींचा स्मृती इराणींसमोर निभाव लागणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी चौकीदार नाही तर जन्मत:च शिवसैनिक !

News Desk

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही”, नितेश राणेंची टीका

Aprna