HW News Marathi
राजकारण

दुसरीकडे जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, थोरातांचा विखे-पाटील यांना टोमणा

शिर्डी | महाराष्ट्रासह देशभरात आज (२९ एप्रिल) चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. राज्यभरात एकूण १७ मतदारसंघांमध्ये मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. आज शिर्डी मतदारसंघांमध्ये सुद्धा मतदान होत आहे. हा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चेचे कारण म्हणजे राधाकृष्ण विखे-पाटील ! शिर्डी मतदारसंघांमधून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्ये चांगलीच खडाजंगी सुरू आहे.

कोणी जर विचारधारा सोडून वागत असेल, एक पक्ष सोडून दुसरीकडे जात असेल तर त्याला जनता नक्कीच माफ करणार नाही, असा खोचक टोला त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना लगावला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. परंतु काँग्रेस पक्ष सोडला नाही. मात्र, त्यांनी शिर्डीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करायला सुरुवात केली. आज मतदान केल्यानंतरसुद्धा बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना टोला लगावायची संधी सोडली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या 10 दिवसात गुलाम नबी आझाद नवी पक्षाची घोषणा करणार

Darrell Miranda

भाजप विरोधात एकजूट रॅलीत विरोधकांचा हल्लाबोल

News Desk

शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk