HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला पायलट जबाबदार

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूरमधील हेलिकॉप्टर अपघातास पायलट जबाबदार असल्याचे विमान दुर्घटना पथकाने केलेल्या अहलवालात म्हटले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अतिरिक्त वजन असूनही पायलटने उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

२६ मे २०१७ रोजी लातूर येथील निलंग्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. सुदैवाने या अपघातात मुख्यमंत्री थोडक्यात बचावले होते. मुख्यमंत्र्यां या दौऱ्यात सकाळी हलगरा येथे श्रमदान केल्यानंतर औराद शहाजानीच्या शासकीय विश्रामगृहावर जेवण घेतल्यानंतर निलंग्यात येथून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाण्यास निघाले होते. मुख्यमंत्र्यांचे विमान जमिनीपासून सुमारे शंभर दीडशे फूट उंचीवर असताना या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बघातच क्षणी ते जमिनीच्या दिशेने वेगाने मैदानावर कोसळले.

तसेच अतिरिक्त वजनासह पायलटने हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा प्रयत्न केल्याने अपघात झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. यावेळी प्रवासी, सामान, इंधनासह हेलिकॉप्टरने वजनाची मर्यादा ओलांडली होती. “पायलटने मोजलेले वजन ४,९४० किलो होते. परंतु न मोजलेल्या ७२ किलो वजनाच्या सामानासह हेलिकॉप्टरचे एकूण वजन सुमारे ५०७२ किलोंवर पोहोचलं होतं,” असे अहवालात म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या हुकुमशाहीविरोधात प्रदेश काँग्रेस सेवादलाची तिरंगा पदयात्रा

News Desk

मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली

News Desk

मुख्यमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, काळजीचे कारण नाही !

News Desk